शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:26 IST

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.

ठळक मुद्देआईच्या तेरवीचा खर्च टाळून सुरू केला टँकर‘आयएमए’ सरकारी दवाखान्यात पुरविते पाणीशिकवणी वर्ग शिक्षकाने सुरू केली जलसेवा

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.यवतमाळ शहरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी नगरपरिषद, शिवसेना आणि विविध पक्षांचे टँकर सुरू आहेत. हे टँकर अपुरे पडत आहेत. यामुळे काही व्यक्ती पुढे आल्या आहेत. सामाजिक दायित्व म्हणून त्या काम करीत आहेत.पेशवे प्लॉटमध्ये असणारे बाळासाहेब नखाते यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या तेरवीचा खर्च वाचवून पाणी वाटण्याचा निर्णय घेतला. यातून पुष्पाताईच्या स्मरणार्थ पाणी टँकर वितरित केले जात आहे. जय गुरूदेव सेवा संघाचे लोक या पाणी वितरणात मोलाची भूमिका पार पाडत आहेत. यातून मानसिक समाधान मिळाल्याचे नखाते म्हणतात.शिंदे प्लॉटमध्ये वास्तव्याला असणारे अरसोड कोचिंग क्लासचे संचालक योगेश अरसोड यांनी सामाजिक ऋण फेडण्यासाठी पाण्याचे टँकर वितरित करण्याचा निर्णय घेतला. ही जलसेवा त्यांनी सुरू केली आहे. शहरातील टंचाई भागात ते मोफत पाणी वितरित करीत आहेत. अजय किन्हीकर त्यांना या कामात मोलाची मदत करीत आहेत.वैद्यकीय महाविद्यालयासाठी आयएमएचे पाणीवैद्यकीय महाविद्यालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यातून भरती विभाग आणि आॅपरेशन थिएटर बंद करण्याची स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पाण्याची टंचाई पाहता आयएमएने पाणी वितरणाचा निर्णय घेतला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्निल मानकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांशी संपर्क केला. त्यांनी पाण्याची अडचण जाणून घेतली. वैद्यकीय महाविद्यालयात दरदिवसाला किमान एक लाख लिटर पाण्याची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालाजवळ २५ हजार लिटर पाण्याची क्षमता आहे. आता आयएमएने २४ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे पाणी पुरवठ्याचा निम्मा प्रश्न निकाली निघण्यास मदत झाली. यासाठी डॉक्टरांनी स्वनिधी गोळा केला आहे.मथुरानगरात पक्ष्यांकरिता पाणवठामाणसांना पाण्यासाठी मारामार सहन करावी लागत आहे. अशा स्थितीत पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची काळजी बोटावर मोजता यईल अशाच लोकांना आहे. यवतमाळ शहरातील शिक्षक नरेश उन्हाळे यांनी यातून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई