शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

राष्ट्रवादी वाढविण्यासाठी विदर्भात प्रयत्न झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांची खंत : पोकळी भरून काढणार

गजानन अक्कलवार ।ऑनलाईन लोकमत कळंब : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली हल्लाबोल पदयात्रा शनिवारी येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बातचित केली.यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. भाजपाला राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा असल्याची शंका वारंवार घेतली जाते. परंतु, या सरकारविरूद्ध राष्टÑवादीनेच वारंवार आवाज उठविला. सरकारच्या धोरणांवर अनेकदा टिका केली. शिवसेना वेळेवर शेपूट घालणारा पक्ष आहे. सरकारमध्ये राहून सरकारविरूद्ध भूमिका घेताना आम्ही कधी पाहीले नाही. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा त्यानी खासदार सुळे यांनी केला.या शासनाने गरिबांची थट्टा चालविली आहे. कर्जमाफीवरून शेतकºयांना जेरीस आणले जात आहे. कीटकनाशकांच्या फवारणीतून झालेल्या विषबाधाप्रकरणी शासन संवेदनाशून्य आहे. मुख्यमंत्री यवतमाळात लपून येतात व कोणाशीही न बोलता निघून जातात. यावरून या शासनाची असंवेदनशिलता अधोरेखित होते. आता झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे आंदोलन यवतमाळातून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाखांचा धनादेश देऊन सरकारने आपली जबाबदारी झटकली. परंतु राष्टÑवादी मात्र आधार देण्याचे काम करणार आहे. काल एका कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची भूमिका पक्षाने घेतली. सरकारनेही इतर कुटुंबांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यवतमाळमधये कृषि विभागात ५०% जागा रिक्त आहे. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकºयांना सुरक्षा कोट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही. त्यामुळे या सरकराच्या थापांना यापुढे बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचारशिवसेना अथवा त्यांच्या मंत्र्यांनी केलेली पाच चांगली कामे सांगावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले. महाराष्टÑाच्या उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ?, असा सवाल करीत त्यांनी शिवसेनेच्या दुट्टप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.केंद्र व राज्य सरकार आश्वासन विसरलेमागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे