शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अकराव्या दिवशी सुटला रेमंड कंपनीतील संपाचा तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:26 IST

रात्री उशिरापर्यंत चालल्या बैठक : चार दिवसांचे वेतन देण्यावर कंपनी झाली राजी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नव्या अॅग्रिमेंटच्या मागणीसाठी संप पुकारला होता. मागील दहा दिवसांपासून यामुळे कंपनीतील कामकाज ठप्प झाले होते. हा संप मिटविण्यासाठी विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींशी गत दहा दिवसांपासून चर्चाही सुरू होती. अखेर गुरुवारी या चर्चा आणि वाटाघाटीला यश आले आहे. दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर रात्री उशिरा कामगारांनी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. कंपनीही संपकाळातील चार दिवसांचे वेतन कामगारांना देणार आहे.

गुरुवारी रेमंड कंपनीतील प्रशासकीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. या बैठकांमध्ये प्रमुख तीन मागण्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. सायंकाळी लोहारा स्थित गंगाकाशी लॉनमध्ये सर्व कामगार संघटना आणि कामगारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी मान्यताप्राप्त ५२-५२ संघटना, प्रहार संघटना, विश्वकर्मा संघटना आणि जनआक्रोश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जनआक्रोश संघटनेचे अक्षय यादव, प्रहार संघटनेचे सचिन देशमुख, विश्वकर्मा संघटनेचे अंबादास मोहुर्ले, मान्यताप्राप्त संघटनेचे कैलास इंगळे, जयदेव लकडे, यासोबतच अनिल यादव, प्रवीण प्रजापती, भास्कर केळापुरे, संतोष डोईजड, कामगार विभागाच्या श्रद्धा वाघमारे, तर रेमंड व्यवस्थापनाचे नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. दरम्यान, रात्री संप मिटल्यानंतर दुसऱ्या पाळीचे कर्मचारी उशिरा कामावर रुजू होत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. 

निलंबनप्रकरणी चौकशी समिती

  • कामगारांकडून अॅग्रिमेंटची प्रमुख मागणी होती. यावर प्रथम कामगारांनी कामावर रुजू व्हायचे.
  • यानंतर मान्यताप्राप्त संघटनेसोबत अॅग्रिमेंटच्या विषयावर रीतसर बोलणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • त्याचप्रमाणे गत दहा दिवसांच्या कामगारांच्या संपकाळातील वेतनापैकी चार दिवसांच्या संपकाळाचे वेतन कंपनी देणार आहे, तर चार दिवसांच्या संप काळातील सीएल पकडल्या जाण्यावर कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये एकमत झाले.
  • संपकाळात मारहाण प्रकरणात सहा कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
  • या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. एक महिन्यात चौकशी करून निलंबित कामगारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ