शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

आई गेली मजुरीला, शाळाच सांभाळतेय लेकराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी मुंबईसारख्या ठिकाणी हंगामी रोजगारासाठी जातात. हे मजूर तीन-चार महिने सलग गावाबाहेर राहत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग त्या-त्या गावांतील शाळेत ‘हंगामी वसतिगृह’ योजना राबविते. यंदा अशा सहा वसितगृहांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळाली. ही वसतिगृहे २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. तर येत्या ३१ मार्चपर्यंत चालणार आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. अशावेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो, त्यांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण होतो. मात्र, शिक्षण विभागाने अशा चिमुकल्यांसाठी सहा हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या ठिकाणी मुलांना जेवण, नाष्टा अशा सुविधांसह कोरोनाचे नियम पाळून शिक्षणही दिले जात आहे. आई-बाबा मजुरीसाठी परजिल्ह्यांत गेलेल्या लेकरांवर या वसतिगृहांनी मायेची छत्रछाया धरली आहे.विशेषत: पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी मुंबईसारख्या ठिकाणी हंगामी रोजगारासाठी जातात. हे मजूर तीन-चार महिने सलग गावाबाहेर राहत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग त्या-त्या गावांतील शाळेत ‘हंगामी वसतिगृह’ योजना राबविते. यंदा अशा सहा वसितगृहांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळाली. ही वसतिगृहे २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. तर येत्या ३१ मार्चपर्यंत चालणार आहेत. हंगामी अनिवासी स्वरुपाच्या वसतिगृहात मुलांना नाष्टा तसेच जेवण दिले जाते. महिन्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणीही केली जाते. सध्या या सहा वसतिगृहांमध्ये एकंदर ४७८ मुले लाभ घेत आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांकडे या वसतिगृहांचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे. मुलांना सुविधा पुरविण्यासाठी येथे प्रतिविद्यार्थी प्रतिदिवस ३२ रुपये ९७ पैसे इतक्या निधीला मंजुरी मिळाली आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या जेवणाची अबाळ झाली होती. मात्र, वसतिगृहांमुळे आता मुलांना पोटभर जेवण मिळू लागल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली.

यंदा स्थलांतर घटलेदरवर्षी महागाव, पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यातील हजारो मजूर ऊसतोडीच्या कामासाठी, वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतर करतात. मात्र, यंदा स्थलांतराचे प्रमाण घटले आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई, औरंगाबादसारख्या शहरातून खेड्यात परतलेले मजूर पुन्हा गाव सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. गावातच मिळेल ते काम करण्याची मानसिक तयारी अनेकांनी केली आहे. त्यामुळे यंदा केवळ सहा हंगामी वसतिगृहांची गरज निर्माण झाली. दिग्रस तालुक्यात तर एकाही वसतिगृहाचा प्रस्ताव आला नाही.

हंगामी वसतिगृहांवर शिक्षण विभागाचा ‘वाॅच’हंगामी वसतिगृहांचा दररोज तालुका आणि जिल्हास्तरावरून शिक्षण विभाग आढावा घेत आहे. किती मुले वसतिगृहात आली, किती जणांना जेवण दिले गेले आदींचा अहवाल रोजच्या रोज घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक मूल जेवण करतानाचा फोटो ऑनलाईन पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, वसतिगृह सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्याध्यापकांना यवतमाळात बोलावून व्यवस्थापनाबाबत तसेच लेखाविषयक प्रशिक्षण देण्यात आले.  

टॅग्स :Schoolशाळा