शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर येणार टाच

By अविनाश साबापुरे | Updated: May 18, 2023 14:21 IST

रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला.

यवतमाळ : ग्रामीण माणसांना १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देणाऱ्या रोहयो योजनेची कामे प्रामुख्याने उन्हाळ्यातच मोठ्या प्रमाणात चालतात. मात्र, यंदा ऐन उन्हाळ्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ही कामे खोळंबली. अडीच हजार कोटींची तरतूद असताना आतापर्यंत केवळ १५८ कोटीचीच कामे होऊ शकलीत. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर टाच येणार आहे.रोजगार हमी योजनेच्या कामातून मुक्त करा, अशी मागणी करत राज्यातील ग्रामसेवकांनी मोठे आंदोलन केले. त्यानंतर राज्यभरातील गटविकास अधिकाऱ्यांनीही महिनाभर काम बंद आंदोलन केले.

रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला. ११ मेपासून ग्राम रोजगार सेवकांनीही मासिक मानधनासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही दिवसांपूर्वीच जुनी पेन्शनसाठी आंदोलन केले. त्यावेळीही रोहयोची कामे बंद होती. तांत्रिक सहायक, सहाय्य कार्यक्रम अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनीसुद्धा पगारवाढीसाठी आंदोलन केले होते. रोहयो कामांच्या साखळीतील या सर्व महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केल्याने यंदाचा उन्हाळा रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी ‘रिकामा’ गेला. या योजनेतील कामाचे अधिकाधिक दिवस हे उन्हाळ्यातच असतात, हे विशेष. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अर्थसंकल्पात मंजूर झालेले हजारो कोटी रुपये खर्च होणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या खर्चाच्या संदर्भात कोणतेही कर्मचारी, अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

काम मिळाले नाही तर...रोहयोमध्ये १०० दिवसांच्या मजुरीची हमी घेण्यात आली आहे. एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यानंतर त्याला १५ दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच न झाल्यास मग्रारोहयोच्या नियमानुसार त्याला बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे. मजुराला त्याच्या घरापासून पाच किलोमीटरच्या आतच काम देणे आवश्यक आहे. पाच किलोमीटरच्या पलीकडे कामाचे वाटप केल्यास मजुराला प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे. यंदा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामांचे वांदे झाले आहेत. तेव्हा शासनाने मजुरांच्या बेरोजगारी भत्त्याबाबत, प्रवास भत्त्याबाबत ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. 

महाराष्ट्र घेणार का पश्चिम बंगालचा धडा?रोहयोची सुरुवात महाराष्ट्राने सर्वप्रथम केली; पण आज या योजनेतून सर्वाधिक कामे करण्यात पश्चिम बंगालने आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगाल सरकार या योजनेसाठी वार्षिक ११ हजार कोटींची तरतूद करून ती खर्चही करीत आहे. महाराष्ट्रात मात्र अवघी अडीच हजार कोटींची वार्षिक तरतूद आहे. त्यातीलही मोजकाच निधी खर्च होत असल्याने मजुरांच्या कामांचे वांदे आहेत. मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी पश्चिम बंगालमध्ये अपर मुख्य सचिवांसह १५ दिवसांचा दौरा करून अभ्यासाअंती महाराष्ट्रातील योजनेत सुधारणा करण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याबाबत अद्यापही हालचाली नाहीत.

बहुतांश कंत्राटदार राजकीय वशिला लावून मंत्रालयातून कामे मिळवतात. त्यातही कुशल कामेच मिळवितात. त्याचा जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास होतो. शिवाय कुशल कामांवरच भर दिला गेल्याने मजुरांना कामे कमी मिळतात. - विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ता 

देशभरातील रोहयो मजुरीचे दरआंध्र प्रदेश २७२, अरुणाचल २२४, आसाम २३८, बिहार २२८, छत्तीसगड २२१, गोवा ३२२, गुजरात २५६, हरयाणा ३५७, हिमाचल २२४ (पेसा २८०), जम्मू काश्मीर २४४, लदाख २४४, झारखंड २२८, कर्नाटक ३१६, केरळ ३३३, मध्य प्रदेश २२१, मणिपूर २६०, मेघालय २३८, मिझोराम २४९, नागालँड २२४, ओडिसा २३७, पंजाब ३०३, राजस्थान २५५, सिक्कीम २३६, तामिळनाडू २९४, तेलंगणा २७२, त्रिपुरा २२६, उत्तर प्रदेश २३०, उत्तराखंड २३०, पश्चिम बंगाल २३७, अंदमान निकोबार ३२८, दादरा नगरहवेली, दमन दिव २९७, पाँडुचेरी २९४, लक्षद्वीप ३०४, महाराष्ट्र २७३ रुपये प्रतिदिन असे मजुरीचे दर आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ