शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:36 IST

चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

ठळक मुद्देगुराख्यामुळे दोघे बचावले 

यवतमाळ : चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. वर थांबलेल्या एका मित्रामुळे दोनजण सुखरूप बचावले. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी मोहदा शिवारातील शेतात घडली. अक्षय मनोज पवार (वय १०) व रणजित श्रीराम भोसले (११, रा. किनवट, ता. कळंब) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम भागातील किनवट गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षय पवार, रणजित भोसले, शिवम पवार (१०), रोहन घोसले (९), विरण पवार (७) हे पाचजण गावशिवारात गुरे चारत होते. दुपारच्या वेळी तहान लागल्याने ते कुंच्या मांडवकार भोसले यांच्या शेतातील विहीरीवर गेले. १२ ते १५ फूट खोल असलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असून, त्यात सहज उतरता येते, त्यामुळे चाैघे खाली उतरले. एकजण वर थांबला. यातील अक्षय व रणजित पाण्यात पडून गाळात फसले. हा प्रकार पाहून वर थांबलेल्या विरण पवार याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच असलेला गुराखी गंगाधर काळे (रा. किनवट) धावून आला. त्याने शिवम पवार व रोहन घोसले या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती होताच संपूर्ण गाव घटनास्थळी पोहोचले. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली; परंतु घटनास्थळ त्यांच्या हद्दीत नव्हते. मोहदा येथील पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. तेथील पोलीस दाखल झाले. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी संपूर्ण कारवाई पार पाडून अक्षय मनोज पवार (१०) व रणजित श्रीराम भोसले (११) यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. सोमवारी शवचिकित्सेनंतर मृतदेह किनवट येथे आणण्यात आले. दोघांवरही दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात