शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 19:36 IST

चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

ठळक मुद्देगुराख्यामुळे दोघे बचावले 

यवतमाळ : चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. वर थांबलेल्या एका मित्रामुळे दोनजण सुखरूप बचावले. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी मोहदा शिवारातील शेतात घडली. अक्षय मनोज पवार (वय १०) व रणजित श्रीराम भोसले (११, रा. किनवट, ता. कळंब) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम भागातील किनवट गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षय पवार, रणजित भोसले, शिवम पवार (१०), रोहन घोसले (९), विरण पवार (७) हे पाचजण गावशिवारात गुरे चारत होते. दुपारच्या वेळी तहान लागल्याने ते कुंच्या मांडवकार भोसले यांच्या शेतातील विहीरीवर गेले. १२ ते १५ फूट खोल असलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असून, त्यात सहज उतरता येते, त्यामुळे चाैघे खाली उतरले. एकजण वर थांबला. यातील अक्षय व रणजित पाण्यात पडून गाळात फसले. हा प्रकार पाहून वर थांबलेल्या विरण पवार याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच असलेला गुराखी गंगाधर काळे (रा. किनवट) धावून आला. त्याने शिवम पवार व रोहन घोसले या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती होताच संपूर्ण गाव घटनास्थळी पोहोचले. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली; परंतु घटनास्थळ त्यांच्या हद्दीत नव्हते. मोहदा येथील पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. तेथील पोलीस दाखल झाले. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी संपूर्ण कारवाई पार पाडून अक्षय मनोज पवार (१०) व रणजित श्रीराम भोसले (११) यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. सोमवारी शवचिकित्सेनंतर मृतदेह किनवट येथे आणण्यात आले. दोघांवरही दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात