शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ठाणेदाराची दादागिरी, शेतकऱ्याला ठाण्यात बोलावून मारहाण केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 16:44 IST

शेतकऱ्याने शेतीच्या रस्त्याबाबतच्या वादाची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर ठाणेदारांनी त्याला ठाण्यात बोलावून घेतले. व एका गावपुढाऱ्याच्या चिथावणीवरून अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात शेतकरी जखमी झाला.

ठळक मुद्देशेतीच्या रस्त्याचा वाद पोहोचला ठाण्यात; उमरखेड ठाणेदाराची शेतकऱ्यास मारहाणशेतकऱ्याची एसपींकडे तक्रार, उपोषणाचा इशारा

यवतमाळ : शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात बोलावून ठाणेदाराने लाथाबुक्क्यांनी व बाजीरावने मारहाण केली. यात त्याच्या तळहातावर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ठाणेदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी तक्रार खरुस (बु ) येथील पीडित शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.

खरुस येथील शेतकरी आनंदराव वानखेडे यांच्याविरोधात शेतातील रस्त्याबाबत वाद केल्याची तक्रार शेतकरी अवधूत वानखेडे यांनी २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर ठाणेदारांनी आनंदराव यांना ठाण्यात हजर होण्याचा निरोप बीट जमादारामार्फत दिला. तेथे हजर झालेल्या आनंदराव यास कॅबिनमध्ये बोलावून ठाणेदार अमोल माळवे यांनी खरूस येथील एका गावपुढाऱ्याच्या चिथावणीवरून वस्तुस्थितीची कुठलीही शहानिशा न करताच अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

बाजीराव काढून दोन्ही तळहातांवर सपासप दहा ते बारा फटके मारले. यातून आनंदराव याच्या तळहाताला व दहाही बोटांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कलम १०७ नुसार कार्यवाही केली तेथे जमानत केल्यानंतर हाताच्या वेदना असह्य झाल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.

ठाणेदार अमोल माळवे यांनी पैशाच्या लालसेपोटी अमानुष मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा मला आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा आनंदराव वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना पाठविल्या आहेत.

खरुस (बु) येथील शेतकऱ्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये मी दोन्ही पार्टींला ठाण्यात बोलावले दोन्ही बाजू ऐकल्या. मारहाण केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. मी कुणालाही मारहाण केली नाही.

- अमोल माळवे, पोलीस निरीक्षक, उमरखेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीPoliceपोलिस