शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ठाणेदाराची दादागिरी, शेतकऱ्याला ठाण्यात बोलावून मारहाण केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 16:44 IST

शेतकऱ्याने शेतीच्या रस्त्याबाबतच्या वादाची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर ठाणेदारांनी त्याला ठाण्यात बोलावून घेतले. व एका गावपुढाऱ्याच्या चिथावणीवरून अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात शेतकरी जखमी झाला.

ठळक मुद्देशेतीच्या रस्त्याचा वाद पोहोचला ठाण्यात; उमरखेड ठाणेदाराची शेतकऱ्यास मारहाणशेतकऱ्याची एसपींकडे तक्रार, उपोषणाचा इशारा

यवतमाळ : शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात बोलावून ठाणेदाराने लाथाबुक्क्यांनी व बाजीरावने मारहाण केली. यात त्याच्या तळहातावर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ठाणेदाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी तक्रार खरुस (बु ) येथील पीडित शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.

खरुस येथील शेतकरी आनंदराव वानखेडे यांच्याविरोधात शेतातील रस्त्याबाबत वाद केल्याची तक्रार शेतकरी अवधूत वानखेडे यांनी २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर ठाणेदारांनी आनंदराव यांना ठाण्यात हजर होण्याचा निरोप बीट जमादारामार्फत दिला. तेथे हजर झालेल्या आनंदराव यास कॅबिनमध्ये बोलावून ठाणेदार अमोल माळवे यांनी खरूस येथील एका गावपुढाऱ्याच्या चिथावणीवरून वस्तुस्थितीची कुठलीही शहानिशा न करताच अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

बाजीराव काढून दोन्ही तळहातांवर सपासप दहा ते बारा फटके मारले. यातून आनंदराव याच्या तळहाताला व दहाही बोटांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कलम १०७ नुसार कार्यवाही केली तेथे जमानत केल्यानंतर हाताच्या वेदना असह्य झाल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.

ठाणेदार अमोल माळवे यांनी पैशाच्या लालसेपोटी अमानुष मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा मला आमरण उपोषणास बसावे लागेल, असा इशारा आनंदराव वानखेडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांना पाठविल्या आहेत.

खरुस (बु) येथील शेतकऱ्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये मी दोन्ही पार्टींला ठाण्यात बोलावले दोन्ही बाजू ऐकल्या. मारहाण केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. मी कुणालाही मारहाण केली नाही.

- अमोल माळवे, पोलीस निरीक्षक, उमरखेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीPoliceपोलिस