शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:33 IST

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली.

ठळक मुद्देकाँग्रेसने संधी सोडली : टिटवीतील शेतकरी आत्महत्या, वाघाचे हल्ले, फवारणीतून विषबाधा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली. वास्तविक हे विषय काँग्रेसला राष्टÑीय-राज्य स्तरावर गाजविता आले असते. परंतु काँग्रेसने ही नामीसंधी सोडली.कर्ज व नापिकीपायी होणाºया शेतकरी आत्महत्यांमुळे दुर्गम, आदिवासी बहुल यवतमाळ जिल्हा जगभर चर्चेत आला आहे. केंद्र व राज्यात सत्ता बदल होऊनही शेतकºयांच्या या आत्महत्या थांबविता आल्या नाहीत किंवा नियंत्रणातही आणता आलेल्या नाहीत. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे भाजपाचे ‘मिशन’ राज्यातच नव्हेतर जिल्ह्यातसुध्दा फेल ठरले. उलट ज्या आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावातून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात देशभरातील शेतकºयांशी ‘चाय पे चर्चा’च्या निमित्ताने संवाद साधला, त्याच मतदारसंघातील टिटवी (ता. घाटंजी) गावात शेतकºयाने मोदींच्या नावाने शिमगा करीत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या शेतकºयाने झाडाच्या पानावर ‘मोदी सरकार, शेतकरी आत्महत्या’ असे लिहिले. थेट पंतप्रधानांचा नामोल्लेख करून आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे हे प्रकरण काँग्रेसला राष्टÑीय मुद्दा बनविता आले असते. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी टिटवी गावात तातडीने भेटी देऊन हा मुद्दा कॅश करणे अपेक्षित होते. परंतु दिल्लीचे तर दूर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य प्रमुख नेतेही या टिटवी गावाकडे फिरकले नाहीत.आदिवासी गावे भयभीतटिटवीतील शेतकरी आत्महत्येशिवाय वाघाचा मानवी वस्त्यांमधील धुमाकूळ, शेतकरी-शेतमजूरांच्या शिकारी, पिकांवर कीटकनाशक फवारताना सहा जणांचा गेलेला बळी, सुमारे २०० शेतकरी-शेतमजुरांना झालेली लागण, त्यामुळे दृष्टी जाण्याचे, मेंदूवर परिणाम होण्याचे घडलेले प्रकार हे मुद्देही गाजत आहेत. वाघ माणसांची, जनावरांची शिकार करतो. मात्र वन विभागाला तो सापडत नाही. त्यामुळेच एसडीओंचे वाहन पेटवून रोष व्यक्त केला गेला. वाघाने पांढरकवडा विभागात आतापर्यंत सहा बळी घेतले. शेतकºयांची जनावरे फस्त केली. त्यामुळे आदिवासी गावे भयभित झाली आहे. या गावातील आदिवासी बांधवांना जणू वाघानेच क्षेत्रबंधनात अडकविल्याचे चित्र आहे.शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषय गाजत असताना राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना त्या गावात भेटी देण्याची, हाकेच्या अंतरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्या शेतकºयांची भेट घेण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. या उलट सत्तेत असूनही भाजपाचे खासदार नाना पटोले पक्षाशी पंगा घेऊन भंडाºयाहून थेट टिटवीत पोहोचले. यावरून शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस (सत्ता जाऊन साडेतीन वर्षे झाल्यानंतरही) खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.स्थानिक नेत्यांकडील भेटीला दिले अधिक महत्वमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने रविवार २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येऊन गेले. किमान ते तरी टिटवी गावाला भेट देतील, अशी अपेक्षा येथील पक्ष कार्यकर्ते आणि भाजपा सरकारला वैतागलेले शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी निराशा केली. स्थानिक नेत्यांकडील भेटी त्यांना अधिक महत्वाच्या वाटल्या. पुसद व यवतमाळातील ईनडोअर कार्यक्रमात हजेरीचा सोपस्कार आटोपून पृथ्वीराज चव्हाण रवाना झाले. त्यांच्या लेखी जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित राहिले. एकतर या प्रश्नांबाबत स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना अंधारात ठेवले असावे किंवा हे प्रश्न पक्षाला कॅश करुन देण्याची त्यांची इच्छाशक्ती नसावी, असे दिसते. टिटवीतील टळलेल्या या सांत्वन भेटीसाठी दोष कुणाचा ? स्थानिक नेत्यांचा की खुद्द माजी मुख्यमंत्र्यांचा हा विषय काँग्रेससाठी चिंतनाचा आहे.