शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? ...तर दुबार पेरणीसाठी बियाणे मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी आठ लाख तीन हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते. तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे शेतशिवारात पेरले आहे.

ठळक मुद्देकपाशी लागवडीची मुदत संपली

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार बॅटींग केली. शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पहिल्याच आठवड्यात बरसला. काही मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करत सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली. आता काही भागात पाऊस पडला तर बहुतांश भागात पाऊसच नाही अशी भयावह स्थिती आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यावर घोंगावत आहे. जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी आठ लाख तीन हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते. तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे शेतशिवारात पेरले आहे. त्यातील काही बियाणे उगवले तर काही बियाणे दडपले आहे. काही बियाणे भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांना पाऊस आल्यानंतर दुबार पेरणी करावी लागणार अशी स्थिती आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ७ तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र आलेले ढग बरसल्याशिवाय खरे नाही. अशीच परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. 

...तर दुबार पेरणी दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंशाच्या जवळ पोहोचत आहे. या कडक उन्हात कोवळे अंकुरलेले बीज टिकणार की नाही अशी परिस्थिती आहे. वातावरण आणखीन असेच राहिले तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. याशिवाय पावसात खंड पडल्याने कीडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. दुबार पेरणी करायची झाली तर पैसे नाही.

जिल्ह्यात बहुतांश भागात पेरणी आटोपली आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल कपाशीकडे दिसत आहे. काही भागामध्ये पावसाचा खंड आहे. यातून पेरण्याही प्रभावित झाल्या आहे. येत्या काही दिवसात पाऊस येण्याचा अंदाज आहे. यातून परिस्थिती सुधारेल. शेतकऱ्यांनी बियाण्यांची खात्री करूनच बियाणे खरेदी करावे. - राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो 

शेतशिवारात पेरणी झाली आहे. सोयाबीन, कपाशी आणि तुरीची लागवड झाली आहे. पहिल्या पावसात कपाशीचे बियाणे निघालेच नाही. यामुळे दुबार टोबणी केली. त्याच्यावर पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे कपाशी लागवड प्रभावीत झाली आहे. याचा शेतीच्या उत्पन्नाला फटका बसणार आहे.  - अविनाश राऊत, शेतकरी 

बेंबळाचे बॅक वाॅटर आमच्या शेतशिवारात दरवर्षी येते. यावर्षी पाणी दूर असले तरी लागवड केलेली कपाशी पाहिजे तशी आली नाही. आता कपाशी काढून सोयाबीन पेरण्याची वेळ आहे. मात्र बाजारात सोयाबीनच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेती करायची तरी कशी असा प्रश्न पडला आहे. हवान विभाग दर वेळेस पाऊस येते असे सांगते. मात्र पावसाचा पत्ता नाही. - शैलेश जयस्वाल, शेतकरी 

सोयाबीन पेरा अडीच लाखांवर थांबला गुलाबी बोंडअळीची दहशत पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र सोयाबीनचे बियाणेच उपलब्ध झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरा क्षेत्र अडीच लाख हेक्टरपर्यंतच मर्यादित राहिले. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती