शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्या, विनय, विवेकाचा मंत्र जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध्यात्मिक विद्या होय. आज शिक्षणासोबतच हिंसा वाढत आहे. सांसारिक शिक्षणासोबतच तणाव वाढत आहे. कारण आत्मविद्येकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमुनिश्री आलोककुमारजी : खैरी येथे महावीर भवन, वीणादेवी दर्डा सभागृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जैन श्रावक संघाच्या वतीने खैरी येथे साकारण्यात आलेल्या महावीर भवनाचे व वीणादेवी जवाहरलाल दर्डा सभागृहाचे रविवारी थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुनिश्री आलोककुमारजी यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, मनुष्यजीवनाचा खरा विकास साधायचा असेल तर प्रत्येकाने तीन सद्गुणांच मंत्र जपला पाहिजे. विद्या, विनय आणि विवेक या तीन प्रेरणांचा विकास केला पाहिजे.मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध्यात्मिक विद्या होय. आज शिक्षणासोबतच हिंसा वाढत आहे. सांसारिक शिक्षणासोबतच तणाव वाढत आहे. कारण आत्मविद्येकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरी प्रेरणा म्हणजे विनय. भगवान महावीर यांच्या व्यवहारातून विनय झळकत होता. वृद्धाश्रम हा समाजाला अभिशाप आहे. जिवंतपणी ज्या आईवडिलांना पाणीही पाजले जात नाही, त्याच आईवडिलांना मृत्यूनंतर तुपाने मढवले जाते. हे समाजातील मोठे व्यंग आहे. कारण प्रत्येकाने विनयाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक जण विनयाने वागला तरच विकास होईल. तिसरी प्रेरणा म्हणजे विवेक. विवेक म्हणजे, अलग-अलग करणे. कोणते कार्य करणीय आणि कोणते अकरणीय, हे ओळखणे म्हणजे विवेक. चांगले काय वाईट काय याचे चिंतन करून त्यानुसार जगणे म्हणजे विवेकाने जगणे होय. माणसाला खरा विकास हवा असेल तर विद्या, विनय आणि विवेकाचे अनुसरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी मुनिश्री आलोककुमारजी यांनी केले. खैरी येथील भवनाचा धार्मिक, अध्यात्मिक कार्यासाठी सदुपयोग व्हाव, अशी अपेक्षा मुनिश्री आलोककुमारजी यांनी व्यक्त केली.यावेळी हिंगणघाट येथील गायक विजय (बंटी) कोठारी व संचाने संगीतमय मंगलाचरण सादर केले. प्रियंका कोचर, संगीता कोचर, छाया झामड, अनिता झामड यांनी स्वागतगीत सादर केले. प्रस्ताविक जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश झामड यांनी केले. संचालन राजेंद्र कोठारी तर आभार भागचंद कोचर यांनी मानले.अरबी समुद्रातील स्मारक आणि राजकारणविजय दर्डा म्हणाले, नागपूरमध्ये पहिल्यांदा सकल जैन समाजाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी पहिला अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. देशभरातील विविध पंथांचे मान्यवर त्यावेळी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. हे परिवर्तन पाहून तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हाराव खास या कार्यक्रमासाठी आले होते. महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने जवळपास ४० देशांना आपल्या अहिंसेच्या विचारांनी वेगळी दिशा दिली, भगवान महावीरांचे ‘जियो और जिने दो’ हे विचारही जगाला दिशा देतात. त्यामुळे त्यांचे अरबी समुद्रात स्मारक बनविल्यास त्यांचा विचार संपूर्ण विश्वाला अहिंसेच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करेल, असा प्रस्ताव मी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापुढे बोलून दाखविला होता. त्यासाठी १०० कोटीचा निधी देण्यासही त्यांनी संमती दर्शविली होती. मात्र पुढे बहुमताच्या राजकारणामुळे ते स्मारक होऊ शकले नाही. स्थळ हे केवळ प्रतीक असते. जीवनविज्ञान हेच आपले जीवन सुंदर आणि सरल बनवू शकते. आपल्या संतांकडून आपल्याला संस्कार मिळतात. मात्र आपण आपल्या संतांचे विचार साहित्यरूपात आणले नाही. हे विचार साहित्यरूपात आणल्यास ते नव्या पिढीला कळतील. आज टीव्ही, सोशल मीडियामुळे नवीन पिढी भलत्याच दिशेला निघाली आहे. त्यामुळे संतांच्या विचारांची आदान-प्रदान झाली पाहिजे आणि त्या विचारांना साहित्यरूपी सुरक्षा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा