शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो शाळा बनवा सुंदर, जिंका बक्षीस; थेट मुख्यमंत्र्यांचे आले पत्र !

By अविनाश साबापुरे | Updated: January 11, 2024 20:24 IST

४५ दिवसांचे विशेष अभियान : स्वच्छतेच्या कामाला मिळणार लाखमोलाचे बक्षीस

यवतमाळ : मामाचे पत्र हरविले... हा खेळ जुन्या पिढीचा. पण सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आलेल्या एका विशेष पत्राची मोठी चर्चा आहे. ते पत्र पाठविलेय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक शाळा सुंदर व्हावी यासाठी ४५ दिवसांचे विशेष अभियान राबविले जात आहे. याच अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहन करणारे हे पत्र आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा’ हे अभियान १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत यात शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. हेच अभियान विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी करावे, याचे मार्गदर्शन-आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठविले आहे. ‘बालभारती’मार्फत आलेल्या या पत्राच्या प्रती जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविले असून त्याचे वाचन होत आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिके तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिके दोन लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला एक लाख रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिके ११ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिके २१ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके ११ लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला सात लाख रुपये आहे. राज्यस्तरावर ५१ लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिके व द्वितीय आलेल्या शाळांना २१ लाख रुपये तर तृतीय ११ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सीईओ डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, डॉ. जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी डॉ. निता गावंडे, उपशिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव राजू मडावी, विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रणिता गाढवे यांनी केले आहे. 

आयुक्तांनी पाठविली कालदर्शिका

अभियान काळात कोणत्या दिवशी कोणते उपक्रम राबवायचे याची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ४५ दिवसांची कालदर्शिका पाठविली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पत्र पाठवून यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबत पालक आणि माजी विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीSchoolशाळा