शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आरक्षण कपातीविरोधात विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:46 IST

केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देनिवेदन : वैद्यकीय प्रवेशात २७ ऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे. याविरोधात शनिवारी ओबीसी आरक्षण बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.वैद्यकीय शिक्षणाकरिता नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील १७७ महाविद्यालयांतील १५ टक्के राखीव जागांचे आरक्षण २ टक्क्यावर आणले आहे. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील ओबीसीची संख्या घटण्याचा धोका आहे.१७७ वैद्यकीय महाविद्यालयात केंद्राच्या १५ टक्के आरक्षणानुसार ३,७११ जागा आरक्षित आहेत. ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा ओबीसीसाठी आरक्षित ठेवणे आवश्यक होते. परंतु, देशभरातीत वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ७४ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी १.८५ टक्के आहे. खुल्या प्रवर्गाकरिता २,८११ जागा सोडण्यात आल्या आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाला मुकणार असल्याचा आरोप ओबीसी आरक्षण बचाव समितीने केला आहे.राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कोट्यात १ टक्का आरक्षणही मिळाले नाही. राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसींना आरक्षणच सोडले नाही, असा आरोप समितीने केला आहे. देशभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी आरक्षण बचाव समितीने दिला आहे.निवेदन सादर करताना प्रदीप वादाफळे, डॉ. दिलीप घावडे, रमेश गिरोळकर, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, राहुल पाटील, जितेंद्र हिंगासपुरे, सुनिता काळे, वैशाली फुसे, अनिता गोरे, निता दरणे, कमल खंडारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणMedicalवैद्यकीय