शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

भटक्या विमुक्तांचा संघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:34 IST

समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या तरुणाची चित्रपट निर्मिती नागपूर, बुलडाण्यातील हत्याकांडांवरही ‘शाेध भाकरीचा’मधून प्रकाशझोत

अविनाश साबापुरे

यवतमाळ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही भटक्या विमुक्त समाजाच्या नशिबातील सामाजिक गुलामगिरी संपलेली नाही. गरीब आणि उपेक्षित असली तरी ही मंडळी अंगभूत कला सादर करण्यात वाकबगार आहे; मात्र त्यांच्या कलेची समाजाला आणि सरकारलाही किंमत नाही. नेमके हेच दुखणे हेरुन यवतमाळातील तरुणाने त्यांच्यावर चित्रपट साकारला आहे. लवकरच तो राज्यभरात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे.

भारत गणेशपुरेसारखा आघाडीचा अभिनेता मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘शोध भाकरीचा’ या सिनेमाची निर्मिती यवतमाळ येथील आनंद कसंबे यांनी केली आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. संपूर्ण चित्रीकरण यवतमाळ शहर व आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले. अविश वत्सल, विश्वनाथ निळे, प्रा. दिलीप अलोणे, महेश राठोड, प्रा. नारायण चेलपेलवार, गजानन जडेकर, डाॅ. ललिता घोडे, संजय माटे, विलास सुतार, भारत लोहकरे, प्रथमेश डोंगरे, वैशाली येडे, सृष्टी दुर्गे, विलास पकडे, गजानन वानखडे, मनीष शिंदे यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. आनंद कसंबे यांच्यासह सुबोध वाळके यांनी चित्रीकरणाची बाजू सांभाळली.

समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात नाथजोगी समाजातील बहुरूप्याचे सोंग घेतलेल्या तीन कलावंतांना संतप्त समूहाने केवळ संशयातून ठार मारले होते. असेच हत्याकांड बुलडाणा व अन्य शहरांमध्येही अलीकडच्या काळात गाजले. त्याचेही पडसाद या सिनेमात उमटले आहेत.

२५ जातींची लोककला पाहण्याची संधी

दिग्दर्शक आनंद कसंबे गेल्या काही वर्षांपासून भटक्या विमुक्त लोकांच्या अडचणींचा अभ्यास करीत आहेत. त्यातूनच त्यांनी बहुरुपी ही जात केंद्रस्थानी ठेवून ‘शोध भाकरीचा’ सिनेमाची निर्मिती केली. सोबतच किंगरी घेऊन फिरणारा नाथजोगी, रामप्रहरी येणारा वासुदेव, पिंगळा (डमरूवाले), पांगूळ, गोसावी, गोंधळी, मसानजोगी, डोंबारी, लोहार, बंजारा, धनगर, छप्परबंद, बेलदार, वडार, पाथरवट, कहार, गारुडी अशा २० ते २५ जातींची झलक आणि त्यांची लोककला या सिनेमात पहायला मिळणार आहे.

भटके विमुक्त म्हणजे काय?

ब्रिटिश राजवटीत १८७१ चा जन्मजात गुन्हेगारी कायदा अस्तित्वात होता. देश स्वतंत्र झाल्यावरही या कायद्यानुसार भटक्या लोकांना गावकुसाबाहेर एखाद्या मैदानात पाल ठोकून ‘खुल्या कारागृहात’ ठेवले जायचे. त्या मैदानाला काटेरी कुंपण असायचे. गाव प्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना कुंपणाबाहेर निघण्यास मनाई होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. तेव्हा ३१ ऑगस्ट १९५२ रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंनी सोलापुरात येवून हे कुंपण तोडले. यावेळी नेहरुजींनी ‘आज से तुम लोग विमुक्त हो गये’ असे उद्गार काढले. कुंपणात असलेल्या १४ जाती विमुक्त झाल्या तर अन्य २८ जाती भटक्या राहिल्या. तेच आजचे भटके विमुक्त. त्यांच्याच जीवनाचा अभ्यास करून आनंद कसंबे यांनी सिनेमा साकारला आहे.

बहुरुपी समाजाचा कलावंत एखादे सोंग घेऊन जेव्हा कुणाच्या घरासमोर येतो तेव्हा त्याला हाकलून लावले जाते. हीच परिस्थिती अन्य समाजातील लोककलावंतांचीही आहे. त्यांचा जीवनसंघर्ष नव्या पिढीला कळावा, दुर्मीळ होत चाललेल्या लोककलांचे दर्शन घडावे म्हणून हा सिनेमा केला.

- आनंद कसंबे, दिग्दर्शक

टॅग्स :Socialसामाजिक