शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:13 PM

यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे १५ दिवस लोटले : पाण्याचा एप्रिलचा मुहूर्त टळण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणातून यवतमाळपर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले. यातून यवतमाळ शहर व परिसरात पाण्याच्या १६ उंच टाकी बांधल्या जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, उपजलवाहिन्या व शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे जाळे नव्याने विणले जाणार आहे. जॅकवेल, फिल्टर प्लँट या कामांचाही त्यात समावेश आहे.फिल्टर प्लँट, टाकी, पाईपलाईन हे मुख्य काम साडेतीनशे कोटींचे आहे. या कामांचे कंत्राट नाशिक येथील शासकीय कंत्राटदार पी.एल. अडके यांना मिळाले आहे. या कामात चौघे भागीदार आहेत. अडके यांना या कामासाठी हरियाणाच्या गौरवकुमार यांनी फायनान्स केले आहे. या कामावरील देखरेखीसाठी कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर (कारंजा) यांची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण कामाचे ड्रॉर्इंग व सुपरव्हीजन बोरकर यांचे आहे.बेंबळा ते यवतमाळ या जलवाहिनीच्या कामासाठी फायनान्सर स्वत: यवतमाळात तळ ठोकून आहे. सद्यस्थितीत पाण्याच्या १६ टाकींचे २० टक्के बांधकाम झाले आहे. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी फायनान्सर गौरवकुमार आणि अभियंता बोरकर यांच्यात वाद झाला. त्यातूनच बोरकर दोन आठवड्यांपूर्वी काम सोडून गावाकडे निघून गेले. तेंव्हापासून पाणीपुरवठ्याचे हे काम बंद आहे.बेंबळाचे पाणी एप्रिलपूर्वी यवतमाळात आणायचेच, यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांची धडपड आहे. एक-एक दिवस महत्वाचा असल्याचे ते अधिकाºयांना सांगतात. तर दुसरीकडे आता १५ दिवसांपासून चक्क प्रमुख कामच बंद असल्याने मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पालकमंत्र्यांकडून कंत्राटदाराची झाडाझडतीकाम बंद असल्याची कुणकुण लागताच पालकमंत्री मदन येरावार यांनी कंत्राटदार अडके, फायनान्सर गौरव कुमार यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. वेळप्रसंगी काम काढून घेण्याची तंबीही त्यांना दिली.सहा स्थानिक कंत्राटदारबेंबळावरून पाणी आणण्याच्या मुख्य कामाचे तुकडे पाडून ते स्थानिक शकील, चव्हाण, समदूरकर, शर्मा, मांगूळकर, कुटे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.