शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:57 IST

एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले.

ठळक मुद्देवैष्णोदेवीहून परतलेले कुटुंब गावात बहिष्कृतकोरोनाची करामत

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परगावातून आलेल्या प्रत्येक माणसाला क्वारंटाईन राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आहे. अनेक जण ती सूचना अव्हेरून गावभर फिरत आहेत. तर दुसरीकडे एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. आरोग्य ठणठणीत असूनही त्याच्याशी साधे बोलणेही लोकांनी बंद केले.कोरोना साथीमुळे ग्रामीण भागात पसरलेल्या विषारी साईड ईफेक्टचे हे उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुसळ गावचे. कळंब तालुक्यातील हे छोटेसे गाव. येथील संदीप भोयर हा तरुण पत्नी सुवर्णा आणि मुलगी परीला घेऊन १३ मार्च रोजी वैष्णोदेवीला दर्शनासाठी गेला होता. हे कुटुंब जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी म्हणजे २१ मार्चला गावात परतले. मात्र जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन संदीपने स्वत:च क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने स्वत:ची आरोग्य तपासणीही करून घेतली. कोणतीही लक्षणे नसूनही तो १४ दिवस घरात राहिला.एकीकडे शासनाच्या सूचना अनेक जण पाळत नसताना संदीपने समजदारी दाखविली. पण त्याचा हाच समंजसपणा गावकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करणारा ठरला. संदीप वैष्णोदेवीहून आला तेव्हापासून अजिबात घराबाहेर निघत नाही, म्हणजे त्याला नक्कीच कोरोनाची लागण झाली आहे, असा पक्का समज गावकऱ्यांनी करून घेतला. गावकºयांनी त्याच्याशी बोलणे सोडले. त्याच्या कुटुंबावरच जणू बहिष्कार टाकला.या प्रकाराने संदीपचे आणि भोयर परिवाराचे सामाजिक जीवनच संपुष्टात आले. अखेर तो पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटला. पुन्हा तपासणी करून घेतली. त्याला कोरोनाचीच काय कोणत्याच आचाराची लक्षणे आढळली नाही. मग त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाच विनंती केली, माझ्यासोबत गावात या आणि लोकांना समजावून सांगा. शेवटी मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मनोज पवार, गावातील आशा सेविका विजया सोनोने, तलाठी भूमिका विथळे आणि गावचे पोलीस पाटील राजेंद्र भिसे हे संदीपसोबत गावात पोहोचले. चौकात संदीपला उभे ठेवून संपूर्ण गावकऱ्यांना गोळा करण्यात आले. पवार यांनी थेट संदीपच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना आवाहन केले, संदीपला कोरोना नाही, त्याला अशा पद्धतीने बहिष्कृत करणे योग्य नाही. उलट तुमच्या काळजीपोटी तो स्वत: क्वारंटाईन झालेला असताना तुम्हीच त्याला रुग्ण ठरवून वाळीत कसे काय टाकता? यावेळी मुसळ गावातील जमलेल्या सर्व महिला-पुरुषांनी आपली चूक कबूल करून संदीप आणि त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकदा नाते जोडले.पोलीस पाटलांनी वेळीच घेतली दखलसंदीप भोयर यांच्या कुटुंबावर कोरोनाच्या धास्तीने गावाने बहिष्कार टाकल्याची बाब लक्षात येताच पोलीस पाटील राजेंद्र भिसे, आशा सेविका विजया सोनोने यांनी तातडीने ही माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचविली. त्यानंतर आरोग्य विभागाने संदीपचे निर्दोषत्व संपूर्ण गावापुढे सिद्ध केले. त्यामुळे एका निरोगी कुटुंबावरचे बहिष्काराचे संकट टळले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस