शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘एसटी’चा संप ऐतिहासिक ठरतोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 13:46 IST

यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला.

ठळक मुद्देसरकार हतबल १९७८ मध्ये संप होता सहा दिवसांचा

विलास गावंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७३ वर्षांच्या कारकीर्दीतील यावेळचा कर्मचारी संप ऐतिहासिक ठरतो आहे. यापूर्वी झालेल्या तीनपैकी सर्वाधिक काळ चाललेला १९७८ चा संप सहा दिवसांचा होता. विशेष म्हणजे, त्यावेळचे सर्व संप आर्थिक बाबींशी निगडित होते. शिवाय, कर्मचाऱ्यांवर कारवाईसुद्धा अपवादानेच झाली होती. मात्र, आज सुरू असलेल्या संपाचा विषय वेगळा आहे. याठिकाणी सरकारची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचे ३६ दिवस पूर्ण झालेले आहेत. पण यावर कुठलाही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो चिघळतच चालला आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे महामंडळ नाममात्र कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसफेऱ्या सुरू करत आहे. चालक, वाहक, यांत्रिक हे प्रमुख कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एसटीच्या इतिहासात कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या कारवाया पहिल्यांदाच झाल्या आणि होत आहेत.

यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. करार लवकर करून वेतनवाढ मिळावी, ही त्यांची मागणी होती. या संपात नियमित कर्मचारी ताकदीने उतरले होते. नवीन कर्मचाऱ्यांचा यात सहभाग नसल्याने प्रवासी सेवा बऱ्यापैकी सुरू होती.

सातवा वेतन आयाेग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी २०१६ मध्ये चार दिवसांचा संप करण्यात आला. वेतन आयोग मिळाला नसला तरी ४८४९ कोटींचे पॅकेज देण्यात आले होते. संपापूर्वी केवळ ७४१ कोटीच देण्याची तयारी होती. त्यावेळी संपात उतरलेल्या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. मात्र, कालांतराने त्यांना कामावर घेण्यात आले. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नव्हता. यावेळच्या संपाची न भुतो... अशी नोंद होत आहे.

दिवाळीतच संप, प्रवाशांची गैरसोय

एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सर्व संप दिवाळीतच केले आहेत. या काळात प्रवाशांची वर्दळ असते. बसेस बंद असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे एसटीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. याहीवेळी दिवाळीपासूनच संप सुरू करण्यात आला. मात्र, संप मिटविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

८०० कोटी रुपयांचे नुकसान

मागील ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळी, पंढरपूर यात्रा कॅश करण्याची संधी महामंडळाला मिळाली नाही. शिवाय, लग्नसराई, प्रासंगिक कराराच्या माध्यमातूनही कमाई करता आली नाही. आता एसटीपासून दूर गेलेला प्रवासी जोडण्याचे मोठे आव्हान महामंडळापुढे आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनstate transportएसटी