शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

‘एसटी’चा संप ऐतिहासिक ठरतोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 13:46 IST

यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला.

ठळक मुद्देसरकार हतबल १९७८ मध्ये संप होता सहा दिवसांचा

विलास गावंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७३ वर्षांच्या कारकीर्दीतील यावेळचा कर्मचारी संप ऐतिहासिक ठरतो आहे. यापूर्वी झालेल्या तीनपैकी सर्वाधिक काळ चाललेला १९७८ चा संप सहा दिवसांचा होता. विशेष म्हणजे, त्यावेळचे सर्व संप आर्थिक बाबींशी निगडित होते. शिवाय, कर्मचाऱ्यांवर कारवाईसुद्धा अपवादानेच झाली होती. मात्र, आज सुरू असलेल्या संपाचा विषय वेगळा आहे. याठिकाणी सरकारची हतबलता स्पष्टपणे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचे ३६ दिवस पूर्ण झालेले आहेत. पण यावर कुठलाही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट तो चिघळतच चालला आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. तर, दुसरीकडे महामंडळ नाममात्र कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसफेऱ्या सुरू करत आहे. चालक, वाहक, यांत्रिक हे प्रमुख कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एसटीच्या इतिहासात कर्मचाऱ्यांवर एवढ्या मोठ्या आणि गंभीर स्वरूपाच्या कारवाया पहिल्यांदाच झाल्या आणि होत आहेत.

यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. करार लवकर करून वेतनवाढ मिळावी, ही त्यांची मागणी होती. या संपात नियमित कर्मचारी ताकदीने उतरले होते. नवीन कर्मचाऱ्यांचा यात सहभाग नसल्याने प्रवासी सेवा बऱ्यापैकी सुरू होती.

सातवा वेतन आयाेग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी २०१६ मध्ये चार दिवसांचा संप करण्यात आला. वेतन आयोग मिळाला नसला तरी ४८४९ कोटींचे पॅकेज देण्यात आले होते. संपापूर्वी केवळ ७४१ कोटीच देण्याची तयारी होती. त्यावेळी संपात उतरलेल्या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. मात्र, कालांतराने त्यांना कामावर घेण्यात आले. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला नव्हता. यावेळच्या संपाची न भुतो... अशी नोंद होत आहे.

दिवाळीतच संप, प्रवाशांची गैरसोय

एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सर्व संप दिवाळीतच केले आहेत. या काळात प्रवाशांची वर्दळ असते. बसेस बंद असल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे एसटीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. याहीवेळी दिवाळीपासूनच संप सुरू करण्यात आला. मात्र, संप मिटविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

८०० कोटी रुपयांचे नुकसान

मागील ३६ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळी, पंढरपूर यात्रा कॅश करण्याची संधी महामंडळाला मिळाली नाही. शिवाय, लग्नसराई, प्रासंगिक कराराच्या माध्यमातूनही कमाई करता आली नाही. आता एसटीपासून दूर गेलेला प्रवासी जोडण्याचे मोठे आव्हान महामंडळापुढे आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीagitationआंदोलनstate transportएसटी