शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

एसटी महामंडळाला गैरव्यवहाराची वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:05 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे.

ठळक मुद्देगंभीर प्रकरणे : अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, चौकशीत झाले स्पष्ट

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगारात गैरव्यवहाराला प्रचंड ऊत आला आहे. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. एवढेच नाही तर, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून रकमेची उचल होत असल्याचे प्रकार घडत आहे. अधिकाऱ्यांचे यावर कुठलेही नियंत्रण नाही, हे अनेक बाबीवरून स्पष्ट झाले आहे.‘एसटी’च्या तोट्याला वाहकच जबाबदार असल्याची ओरड महामंडळाकडून नेहमी केली जाते. मात्र इतरही घटक याला कारणीभूत आहे, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. आर्थिक व्यवहारात एसटी कारवाई करण्यात थोडीही कसर सोडत नसल्याचे सांगितले जाते. तरीही गैरप्रकाराची मालिका सुरूच आहे. टायर फिटरच्या कामासाठी बाहेरील कामगारांची आयात या आगारात करण्यात आली होती. या कामासाठी एसटीचे स्वतंत्र तीन कामगार असताना अवाजवी दरात बाहेरील लोकांकडून टायर फिटरचे काम करून घेतले जात होते. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचून कारवाई सुरू झाली.या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच १२०० रुपयांच्या अग्रिमचे प्रकरण पुढे आले. डी.आर. बनारसे नामक कामगाराने वाहनाच्या (क्र.८४४१) बेलहाउसिंग कामासाठी यवतमाळ आगाराच्या रोकड शाखेतून १२०० रुपयांची उचल केली. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही खर्चाचा हिशेब या कामगाराने सादर केला नाही. रोकड शाखेतून उचल केलेल्या अग्रिम रकमेची प्रतिपूर्ती ४८ तासांच्या आत करण्याचा एसटीचा नियम आहे. एवढेच नाही तर, सहायक कार्यशाळा अधीक्षकांनी आगार व्यवस्थापकांच्या शिक्क्यावर स्वत:ची स्वाक्षरी करून अग्रिम रक्कम दिली. अधीक्षकाचा प्रभार सध्या जे.बी. खान यांच्याकडे आहे. आर्थिक बाबतीत कामगारांकडून झालेली चूक सहन न करणाऱ्या महामंडळाकडून या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे संपूर्ण कामगारांचे लक्ष लागले आहे.शिवशाहीला प्रवाशांची प्रतीक्षामहागामोलाची शिवशाही एसटीच्या ताफ्यात दाखल झाली. तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या बसला प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागते. यवतमाळ बसस्थानकातून सकाळी ६ वाजतापासून शिवशाहीच्या फेऱ्या सुरू होतात. काही बसेस तर नेमके प्रवासी घेऊन मार्गावर जाते. अधिक भाडे, प्रवासासाठी इतर बसेस ऐवढाच लागणारा वेळ आणि शिवशाही सोबतच लागणाऱ्या कमी प्रवासभाड्याच्या बसेस यामुळे शिवशाहीला प्रवासी मिळत नसल्याचे सांगितले जाते.