शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ चालतेय प्रभारीच्या चाकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:59 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसमस्यांचा डोंगर : अधिकारी ते कामगारांची वानवा, तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.मागील काही महिन्यांपासून विभाग नियंत्रक प्रभारी आहे. विभागीय वाहतूक अधिकारी, वणी येथे नियमित आगार व्यवस्थापक नाही, यवतमाळ बसस्थानकाला प्रमुखही प्रभारीच आहे. वाहतूक निरीक्षकही कायम स्वरूपी नाही. याशिवाय मुख्य कारागिरांची वाणवा आहे. शिकाऊ उमेदवारांकडून कार्यशाळेचा कारभार ढकलला जात आहे.नियमित अधिकारी नसल्याने कामांमध्ये सातत्य नसल्याचे दिसून येते. केवळ दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. जबाबदारीने काम सांभाळले जात नाही. परिणामी बसफेºया रद्द होणे, बसेसची वेळेत दुरुस्ती न होणे या व इतर प्रकारच्या कामांवर परिणाम होत आहे. भाडेवाढीच्या दिवशी तर अनेक मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या होत्या. काही ठिकाणच्या फेºया उशिराने गेल्या. यात महामंडळाचे नुकसान झाले. बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याची या विभागात नेहमीची ओरड आहे. पंढरपूर यात्रा जवळ आली आहे. यासाठी ७० ते ८० बसेस सोडल्या जाणार आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर बसचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे आगारात दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बसेसची कामे तातडीने होण्याची गरज आहे. यासाठी अधिकाºयांना खंबीर भूमिका घ्यावी लागणार आहे.मार्ग बदलविला, मात्र भाडे कायमयवतमाळ बसस्थानक ते वडगावपर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने या भागातून जाणाºया बसेसचा मार्ग बदलविण्यात आला आहे. लोहारा, भोयर, वाघाडी असा जवळपास सात ते नऊ किलोमीटरचा फेरा घेऊन बस आर्णी मार्गावर जात आहे. एक टप्प्यापेक्षा अधिक प्रवास या मार्गाने जाणाºया बसेसचा वाढला आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन भाडेवाढ अपेक्षित होती. हा निर्णय न झाल्याने महामंडळाचे दररोज किमान तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शारदा चौक ते भोसा मार्गाचे काम सुरू असताना पांढरकवडा बायपासवरून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाने घाटंजी मार्गावरील बसचे भाडे वाढविले होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ