शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
3
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
4
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
5
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
6
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
7
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
13
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
14
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
15
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
16
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
17
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
18
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
19
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
20
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

सुषमा स्वराज यांचे ते भाषण संस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:46 PM

सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

ठळक मुद्देअणे विद्यालयाचा रौप्य महोत्सव : विद्यार्थिनींना दिला होता मूलमंत्र

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषण यवतमाळकरांच्या आजही स्मरणात आहे.स्वराज यांच्या राहणीतील साधेपणा आणि उच्चविचारांनी यवतमाळकर भारावून गेले होते. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढवून प्रगती कशी करावी, या विषयावर त्या बोलल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी या विषयावर मार्गदर्शन केले.सुषमा स्वराज यांच्या वक्तृत्वाने सारेच भारावून गेले होते. त्यांच्या मौलिक विचाराने अनेक युवतींच्या आयुष्याला दिशा मिळाली. यामुळे त्यांचे भाषण आजही प्रत्यक्षदर्शींच्या स्मरणात आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव कायम आहे. त्यांच्या कार्यशैलीतून अनेकबाबी त्यावेळी यवतमाळकरांना शिकायला मिळाल्या. त्यावेळी सुषमा स्वराज यवतमाळात दोन दिवस मुक्कामी होत्या. अस्मिता या स्मरणिकेचे प्रकाशन त्यांनी केले. त्यांनी स्वत: निरोप घेताना आदरातिथ्याचे कौतुक केले. यावेळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म.ल.काशीकर, सचिव रमेश मुणोत, अ‍ॅड .श्रीहरी अणे, राजाभाऊ ठाकरे, अरूण अडसड, हरिभाऊ तत्त्ववादी, मनोहर धर्माधिकारी, दिवाकर पांडे आदी स्वागतासाठी पुढे आले होते.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. त्या आम्हा महिलांसाठी आदर्श होत्या. स्पष्ट बोलणाऱ्या आणि त्या बोलण्यातून कुणालाही न दुखविणाºया त्या होत्या. त्यांच्या वक्तृत्वाने मी भारावून गेले होते. आजही त्या माझ्यासाठी आदर्श आहेत.- डॉ. कविता तातेड, प्राध्यापक, अणे महिला विद्यालय

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजStudentविद्यार्थी