शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सोयाबीनला मिळतो हमी दरापेक्षा कमी भाव; शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:10 IST

Yavatmal : खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच सोयाबीनला किमान चार हजार, तर कमाल चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

शासनाचा हमीभाव कागदावरच आहे. प्रत्यक्ष भाव कमी मिळत आहे. सोयाबीन बाजारात येण्याआधी शासनाने जरी आयात शुल्कात वाढ केली, तरी मात्र प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी जागतिक बाजारपेठ व पुढील नियोजन करूनच सोयाबीन खरेदी करीत आहेत. 

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीपासून तर पेरणी, फवारणी आणि सोयाबीन काढणी आदी कामांसाठी खूप मोठा खर्च येतो. मात्र सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील अनेक वर्षांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरणच होत आहे. शिवाय विविध कारणांमुळे सोयाबीनचा उताराही घटत आहे. 

दरवाढीच्या आशेने सोयाबीन घरात दरामध्ये वाढ होईल या आशेने काही शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सोयाबीन राखून ठेवले आहे. आता विकायला काढण्याचा प्रयत्न केला तरी चांगला भाव मिळत नाही. नाईलाजाने त्यांना मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. शासनाच्या कृषी धोरणावर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सोयाबीनचा हमीभाव चार हजार ९०० रुपये प्रती क्विंटल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा किती तरी कमी दराने खरेदी करावी लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी