शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दहा लाखांवरील पेरण्या अडचणीत; विदर्भासह मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट

By रूपेश उत्तरवार | Updated: July 4, 2023 10:56 IST

पावसाची २० ते ६० टक्के तूट : हवामानाचे अंदाज खोटे ठरले

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी २० ते ६० टक्के पावसाची तूट आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि डाळवर्गीय पीके आणि सुमारे दहा लाख हेक्टरवरील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. गत चार दिवसांपासून पाऊसच नसल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे.

संपूर्ण राज्यात एक कोटी ४२ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होते. यापैकी १८ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. यातील दहा लाख हेक्टर क्षेत्राची अवस्था बिकट आहे. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांचा यात समावेश आहे. कापसाचा लागवड कालावधी मिळविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. या ठिकाणी कापसाचे सर्वाधिक क्षेत्र धोक्यात आले आहे. गत पाच दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे कापसाचे पीक आता माना टाकत आहे. सोयाबीन अंकुरण्यासाठी त्याला पूर्ण ताकद मिळणेही अवघड झाले आहे.

कालावधी संपल्याने मूग आणि उडदाच्या पेरण्या विदर्भात झाल्या नाहीत. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातून हे क्षेत्र नगण्य झाले आहे. डाळवर्गीय पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूरमध्ये ७० टक्के तूट आहे. नागपूरमध्ये ५० टक्के, गोंदिया, अकोला, भंडारा, बुलढाणा आणि गडचिरोलीमध्ये ८० टक्क्यांपर्यंत तूट नोंदविण्यात आली आहे.

हवामानाचे अंदाज फेल ठरले

हवामान विभागासह पंजाब डख आणि इतर यंत्रणेकडून वर्तविण्यात आलेले पावसाचे अंदाज जून महिन्यात खोटे ठरले. यातून शेतकरी सर्वाधिक संकटात सापडले आहेत. यलो अलर्टनंतरही अनेक ठिकाणी पाऊस बरसला नाही. यामुळे पेरणी केलेले शेतकरी चांगलेच अडचणीत आहेत. आता काही ठिकाणी पीक अंकुरले आहे, तर अनेक ठिकाणी अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. यात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस