सहा हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला लागला ब्रेक
By Admin | Updated: July 15, 2015 02:58 IST2015-07-15T02:58:53+5:302015-07-15T02:58:53+5:30
जिल्ह्यात दहावी आणि बारावीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे विद्यापीठाने आधी स्पष्ट केले होते.

सहा हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला लागला ब्रेक
वरिष्ठ महाविद्यालय : विद्यापीठाने वाढीव जागांचे आदेशच दिले नाही
यवतमाळ : जिल्ह्यात दहावी आणि बारावीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे विद्यापीठाने आधी स्पष्ट केले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन महाविद्यालय सुरू झाले. मात्र, वाढीव क्षमतेबाबत विद्यापीठाने कुठल्याही महाविद्यालयाला मान्यता दिली नाही. मात्र, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याइतपत क्षमता जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नाही. असे सहा हजार विद्यार्थी प्रवेशाला मुकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाविद्यालयामध्ये धाव घेतली आहे. तर निर्णयाअभावी कुठलाही प्रवेश देण्यास महाविद्यालयाने नकार दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गत दोन वर्षांपासून प्रवेशाचा नवा पेच निर्माण होत आहे. महाविद्यालयांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. (शहर वार्ताहर)