शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे उघडायला हवीत काय, कोणत्या पक्षाला काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाली. त्यामुळे कोरोनाचा कहर अनुभवलेल्या प्रत्येकाने आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झालेली आहे. अशीच परिस्थिती राज्यभरात आहे. मात्र, त्याचवेळी केरळ राज्यात स्थानिक सणांमुळे कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राज्य शासन विशेष दक्षता घेत आहे.

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रुग्णसंख्या घटलेली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम आहे. अशा स्थितीत मंदिरे उघडायला हवीत काय, हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे. शासकीय बैठका, बाजारपेठेसह हॉटेल, मंगल कार्यालये सुरू असताना केवळ मंदिरात गेल्यानेच कोरोना होतो, असा शोध आघाडी सरकारने कुठून लावला, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. तर हे तर केंद्र शासनाने दिलेले निर्देश असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाली. त्यामुळे कोरोनाचा कहर अनुभवलेल्या प्रत्येकाने आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झालेली आहे. अशीच परिस्थिती राज्यभरात आहे. मात्र, त्याचवेळी केरळ राज्यात स्थानिक सणांमुळे कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राज्य शासन विशेष दक्षता घेत आहे. मात्र, ही काळजी घेतानाच बाजारपेठेसह अनेक आस्थापना सुरू असताना केवळ धार्मिक स्थळांवर निर्बंध का, असा कळीचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोना निर्बंधामुळे श्रावणातही भाविकांना मंदिरात जाता येत नाही. पर्यायाने या धार्मिक स्थळांच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच मंदिरासह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. तर धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश केंद्रानेच दिलेले आहेत. कोरोनाची संभाव्य लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य शासन केंद्राच्या निर्देशानुसार याबाबतची कार्यवाही करीत नसल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सर्वांनीच अनुभवला आहे. कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले असून, उपचारानंतर बरे झालेले अनेकजण अन्य व्याधींचा आजही सामना करीत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्रानेच नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने वर्तविल्यानंतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्र शासनाने त्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. तिरुपतीसह देशभरातील प्रमुख मंदिरे बंद असताना केवळ राजकीय हेतूने आघाडी शासनावर आरोप करणे चुकीचे आहे. येणारे दिवाळी-दसऱ्यासारखे मोठे सण पाहता दक्षता घ्यायलाच हवी.- पराग पिंगळे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

मंदिर केवळ श्रद्धेचा किंवा आस्थेचा विषय नाही, तर लाखो लोकांच्या उपजीविकेचेही ते साधन आहे. श्रावणासारख्या महिन्यात याठिकाणी होणाऱ्या उलाढालीतून मंदिर व्यवस्थापन वर्षभराचे आर्थिक नियोजन करते. मात्र, आता ही व्यवस्थाच आघाडी शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ढासळली आहे. शासकीय बैठकांसह बाजारपेठा, मंगल कार्यालये तुडुंब असताना केवळ मंदिरांवरच निर्बंध का, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास भाजप पदाधिकारी मंदिरे उघडण्यासाठी पुढाकार घेतील.- नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष, भाजप

देवाचे स्थान हृदयात आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी मंदिरात जाता आले नाही तरी वाईट वाटून घ्यायला नको. कुटुंबाच्या, समाजाच्या भल्यासाठीच शासनाने निर्बंध घातलेले आहेत. कोरोना महामारीमुळे होणारे नुकसान सर्वांनी अनुभवलेले आहे. पुन्हा ती वेळ येऊ नये, यासाठी काही दिवसांसाठी निर्बंध लागू असल्यास त्याचे पालन करायला हवे. हे सर्वांच्याच हिताचे आहे.- चंदू चौधरी, शहराध्यक्ष, काँग्रेस

 

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या