शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

धक्कादायक ! राज्यात एकाच महिन्यात झाले तब्बल १२३६ बालमृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:46 AM

एकाच महिन्यात राज्यात तब्बल १२३६ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब खुद्द मंत्र्यांनी विधिमंडळात उत्तराद्वारे कबूल केली आहे.

ठळक मुद्देमंत्र्यांची कबुली महिला व बालकल्याणची निष्क्रियता उघड

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : चिक्की घोटाळा व पोषण आहार पुरवठ्यातील गैरप्रकाराने गाजत असलेल्या महिला व बालकल्याण खात्यातील निष्क्रियतेवर आता बालमृत्यूनेही शिक्कामोर्तब केले आहे. एकाच महिन्यात राज्यात तब्बल १२३६ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब खुद्द मंत्र्यांनी विधिमंडळात उत्तराद्वारे कबूल केली आहे.राज्यात भाजप व शिवसेना युती सरकारच्या स्थापनेपासूनच महिला व बालकल्याण विभाग गाजतो आहे. कधी चिक्की घोटाळ्याने तर कधी पोषण आहारातील पुरवठा, वाहतुकीच्या कंत्राटांनी या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या विभागाच्या निष्क्रियतेमुळे झालेले बालमृत्यूही गाजले आहे. २०१७ मध्ये एप्रिल या एकाच महिन्यात राज्यात तब्बल एक हजार २३६ बालमृत्यूची नोंद झाली आहे. तसा अहवाल एकात्मिक बालविकास सेवा योजना यंत्रणेने दिला आहे. एकाच महिन्यातील मृत्यूची ही बाब खरी असली तरी हे मृत्यू कुपोषणामुळे नसल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तारांकित प्रश्नावर दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. विविध आजार व संसर्गजन्य आजारांमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे. एक हजार २३६ मृत बालकांपैकी ९१६ बालके ही ० ते १ वयोगटातील तर ३२० बालके ही १ ते ५ वर्षे वयोगटातील आहेत. राज्यात ८० हजार बालके तीव्र कुपोषित गटात असून पोषण आहार मिळत नसल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप विधान परिषदेच्या आमदारांनी केला होता. परंतु ही बाब मंत्र्यांनी स्पष्टपणे नाकारली आहे. बालके, गर्भवती व स्तनदा माता, तीव्र कमी वजनाची मुले यांना टीएचआर तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार नियमित पुरविला जात असल्याचा दावा मंत्र्यांनी उत्तरात केला आहे.नऊ हजार रिक्त पदांचाही परिणाममहिला व बालकल्याण खात्याच्या कामकाजावर रिक्त पदांचाही मोठा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. आजच्या घडीला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची ३५२, मुख्य सेविकांची ७१५, अंगणवाडीसेविकांची १६२०, मिनी अंगणवाडीसेविका १३३९ व मदतनिसांची पाच हजार १७२ अशी नऊ हजार १९८ पदे रिक्त आहेत. त्याचा फटकाही उपलब्ध यंत्रणेला सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या योजनांची अंमलबजावणी व बालकांच्या संगोपनावर होतो आहे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केले गेले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू