शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांच्या खांद्यावरही बंडाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 05:00 IST

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते.  त्यामुळे राठोड यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतानाच गुरुवारी ते आमदार दादा भुसे यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले.  रात्री ९.३० च्या सुमारास संजय राठोड यांच्यासह दादा भुसे आणि रवींद्र फाटक गुवाहाटीत पोहोचल्याचेही सांगण्यात आले. 

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील २५ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव आमदार संजय राठोड हेही अखेर गुरुवारी गुवाहाटीकडे रवाना झाले. तत्पूर्वी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत राठोड यांनी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपण काय भूमिका घ्यायला हवी, तुम्हाला काय वाटते, अशी विचारणा त्यांनी अनेकांना केली. दरम्यान, राठोड हे बंडखोरांच्या गटात सामील होत असले तरी  जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेबरोबरच ठामपणे राहण्याचे निश्चित केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आमदार संजय राठोड यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. राठोड यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. वयाच्या २७ व्या वर्षी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर दारव्हा-दिग्रस-नेर या तालुक्यांत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून २००४ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर २००९, २०१४  आणि २०१९ असे चार वेळा  मोठ्या फरकाने विजयी होत त्यांनी सेनेचा बालेकिल्ला कायम राखला. युती सरकारमध्ये यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुराही त्यांच्याकडे होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून विदर्भातील एकमेव मंत्री म्हणूनही राठोड यांनी काम पाहिले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वांच्याच नजरा राठोड यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. बंडखोर आमदारांनी सूरत गाठल्यानंतर राठोड यांंचे नाव चर्चेत आले. मात्र, शिवसेनेच्या बैठकीला ते ‘मातोश्री’वर उपस्थित होते.  त्यामुळे राठोड यांची नेमकी भूमिका काय याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतानाच गुरुवारी ते आमदार दादा भुसे यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले.  रात्री ९.३० च्या सुमारास संजय राठोड यांच्यासह दादा भुसे आणि रवींद्र फाटक गुवाहाटीत पोहोचल्याचेही सांगण्यात आले. 

अनेक पदाधिकारी शोधत आहेत संकटात संधी 

- अनेक आमदारांनी सेनेची साथ सोडली असली तरी जमिनीवरील शिवसैनिक आजही सेनेसोबत आहे आणि हीच उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. केवळ आमदार- खासदार म्हणजे पक्ष नसतो तर संघटनेमागे अस्मिता, विचार, जनाधार असावा लागतो. त्यामुळे नेते संपले तरी संघटना संपत नाही. अनेक मतदारसंघात शिवसेनेकडे दुसऱ्या फळीतील तगडे कार्यकर्ते आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही शिवसेनेची पाळेमुळे घट्ट असून अनेक पदाधिकारी मागील १५-२० वर्षांपासून  निष्ठेने सेनेचे काम करत आहेत. आमदार-खासदारांसारखे ज्येष्ठ नेते बाहेर पडत असताना या निष्ठावंत शिवसैनिकांना संधी खुणावत आहे. त्यामुळेच पुढील काळात जिल्ह्यात पुन्हा सेनेला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलणार - जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले संजय राठोड एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्याने  याचा जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दारव्हा-दिग्रस मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय राठोड यांचे या मतदारसंघावर एकहाती प्राबल्य आहे. तेथे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर, अपक्ष संजय देशमुख यांच्याशी त्यांचा सामना होतो. दारव्हा-दिग्रस या दोन्ही तालुक्यांतील शिवसैनिक मोठ्या संख्येने राठोड यांच्यासोबत  जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला नव्याने बांधणी करावी लागेल.

 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडShiv Senaशिवसेना