शिवणीच्या कालव्यातील सांगाडा गुंठाचाच
By Admin | Updated: September 24, 2014 23:42 IST2014-09-24T23:42:37+5:302014-09-24T23:42:37+5:30
गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली.

शिवणीच्या कालव्यातील सांगाडा गुंठाचाच
यवतमाळ : गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी येथील पिंपळगाव परिसरात गौरव उर्फ गुंठा राऊत याच्या अपहरण प्रकरणाचे अखेर रहस्य उलगडले.
आनंद उर्फ गोलू पारधी (२३), सतीश चंद्रशेखर चौधरी (२१), मनिष रामदुल्हारे यादव (२१) तिघेही रा. पिंपळगाव, आरीफ शहा शफीक शहा (२६) रा. बोरगाव, अक्षय अनिल गुंजाळ (२३) रा. गिरीजानगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. २१ जुनच्या रात्री ११ वाजता येथील पिंपळगाव बायपास मार्गावर गौरव उर्फ गुंठा राउत (२२) रा. मोठे वडगाव याच्या मागावर असलेल्या टोळक्याने त्याचे अपहरण केले. तेव्हापासून गुंठा बेपत्ता होता. तर येथील गुन्हेगारी वर्तुळातील अनेक संशयित पसार होते. तीन महिने उलटूनही गुंठाचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस संशयितांच्या मागावर होते. त्यातच येथील उपविभागिय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना गोलू पारधी याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी क्रमांक सायबर क्राईम सेलमार्फत ट्रेस केला. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गोलूचे लोकेशन मध्यप्रदेशातील भिंड आणि त्यानंतर बालाघाट येथे आढळून आले. त्यांनी लगेच पथक रवाना करून बालाघाट येथे शोध घेतला. तेव्हा गोलू हा साथीदार मनिषसह मामा तुळशीराम बगमारे रा. बालाघाट यांच्याकडे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांनाही अटक केली. माहितीच्या आधारे आरीफ शहा याला आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे, अक्षयला एलआयसी चौकातून तर सतीशला त्याच्या घरून अटक केली. त्यांनी १३ जणांनी गुंठावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची कबूली दिली. तसेच मृतदेह स्कॉर्पीओ वाहन (क्र. एमएच १६ - जी. १६५६) ने घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कालव्यात डिझेल टाकून जाळल्याचे उघड केले. त्यानंतर प्रविण दिवटे, विक्की कनाके दोघेही रा. यवतमाळ आणि हाजी सरवर उर्फ हाजी भाई रा. घुग्गुस असे आठजण पसार झालो. मात्र बजरंग सोळंकी, आकाश धनाडे, सागर भूते, अशोक उर्फ भुऱ्या येसणे आणि चालक निलेश उर्फ टेलर कोयरे सर्व रा. यवतमाळ हे घराकडे परतल्याचेही त्यांनी सांगितले. कारवाई फौजदार संतोष माने, ईक्बाल शेख, संतोष मडावी, प्रमोद मडावी, तुषार नेवारे, विजय जाधव यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)