शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 15:04 IST

गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देयोग्य लाभार्थीस अन्नधान्य मिळण्यास मदतयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक मशीन्सचा वापरअमरावती विभागातील सर्वच दुकानात मशीन्स

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी सात हजार ३४३ पॉस (पीओएस - पॉर्इंट आॅफ सेल) मशिन्स बसविण्यात आली आहे. धान्य खरेदी करणाºया ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरित करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.अमरावती विभागात सर्वाधिक पॉस मशिन्स यवतमाळ जिल्ह्यात बसविण्यात आल्या आहेत. यवतमाळ तालुक्यात २ हजार ६९ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. पुसद तालुक्यात सर्वाधिक २०० तर यवतमाळमध्ये १९३ मशीन्स बसविण्यात आले आहेत. झरीजामणी या आदिवासी बहुल तालुक्यात १०२ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात १ हजार ९१२ मशीन बसविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६५ मशीन्स अचलपूर तालुक्यात बसविण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातही मशीन्स बसविण्यात आल्या आहे. यात धारणी तालुक्यात १६१ तर चिखलदरा तालुक्यात १५२ मशीन्स कार्यरत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ५२४ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७४ तर त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात १७१ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यात एक हजार ६० मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. यात ३०१ मशिन्स अकोला तालुक्यात आहे. अकोटमध्ये १६४ तर मुर्तीजापूर तालुक्यात १६३ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. वाशिम जिल्ह्यात ७७८ मशिन्स असून कारंजा तालुक्यात १४७ तर वाशिम तालुक्यात १४५ मशिन्स आहेत.अशी होते यंत्रणा कार्यान्वितलाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मशीनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अश पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.‘अनुदानातून बाहेर पडा’ योजनाशिधापत्रिकेवरील धान्य काही लाभार्थी घेत नाहीत. तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.