शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 15:04 IST

गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देयोग्य लाभार्थीस अन्नधान्य मिळण्यास मदतयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक मशीन्सचा वापरअमरावती विभागातील सर्वच दुकानात मशीन्स

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी सात हजार ३४३ पॉस (पीओएस - पॉर्इंट आॅफ सेल) मशिन्स बसविण्यात आली आहे. धान्य खरेदी करणाºया ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरित करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.अमरावती विभागात सर्वाधिक पॉस मशिन्स यवतमाळ जिल्ह्यात बसविण्यात आल्या आहेत. यवतमाळ तालुक्यात २ हजार ६९ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. पुसद तालुक्यात सर्वाधिक २०० तर यवतमाळमध्ये १९३ मशीन्स बसविण्यात आले आहेत. झरीजामणी या आदिवासी बहुल तालुक्यात १०२ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात १ हजार ९१२ मशीन बसविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६५ मशीन्स अचलपूर तालुक्यात बसविण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातही मशीन्स बसविण्यात आल्या आहे. यात धारणी तालुक्यात १६१ तर चिखलदरा तालुक्यात १५२ मशीन्स कार्यरत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ५२४ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७४ तर त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात १७१ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यात एक हजार ६० मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. यात ३०१ मशिन्स अकोला तालुक्यात आहे. अकोटमध्ये १६४ तर मुर्तीजापूर तालुक्यात १६३ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. वाशिम जिल्ह्यात ७७८ मशिन्स असून कारंजा तालुक्यात १४७ तर वाशिम तालुक्यात १४५ मशिन्स आहेत.अशी होते यंत्रणा कार्यान्वितलाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मशीनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अश पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.‘अनुदानातून बाहेर पडा’ योजनाशिधापत्रिकेवरील धान्य काही लाभार्थी घेत नाहीत. तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.