शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

एकाच रात्री सात आत्महत्या

By admin | Updated: January 10, 2015 23:02 IST

उमरखेड येथे चिमुकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन, जांभोरा येथे विवाहितेने जाळून घेऊन तर यवतमाळात दोन जणांनी तर उमरखेड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

हळहळ : दोन महिलांचा समावेशयवतमाळ : उमरखेड येथे चिमुकलीसह मातेने विहिरीत उडी घेऊन, जांभोरा येथे विवाहितेने जाळून घेऊन तर यवतमाळात दोन जणांनी तर उमरखेड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एकाच रात्री जिल्ह्यात सात जणांनी आत्महत्या केल्याचे पुढे आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ज्योती खंडू शिंदे (३२) रा.झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड, रंजना अशोक ढेकले (२५) रा.जांभोरा ता.दारव्हा, मनोहर अर्जून शेजाळ (३४) रा.तिवरंग ता.उमरखेड, अतुल केशव माने (३२) रा.नाथनगर उमरखेड, प्रशांत संभाशिव चवलेवार (३६) रा.सुरजनगर यवतमाळ, अब्दुल मन्नान अब्दुल मस्तान (६५) रा.अलकबीरनगर यवतमाळ अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. तर वैष्णवी खंडू शिंदे (४) असे आईसोबत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. उमरखेड येथील ज्योती खंडू शिंदे या विवाहितेने मुलगी वैष्णवी (४) हिच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दारूड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार ज्योतीची आई रुक्माबाई पानपट्टे यांनी पोलिसात दिली. तिचा विवाह खंडू सोबत २००२ मध्ये झाला होता. खंडू हा खासगी वाहन चालक आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो दारूच्या आहारी गेल्याने पत्नीला मारहाण करून त्रास देत होता. ज्योतीने माहेरी माहिती दिली होती. दरम्यान, शुक्रवार ९ जानेवारी रोजी ती आपली सर्वात लहान मुलगी वैष्णवी हिच्यासह निघून गेली. शोधाशोध करण्यात आली. परंतु ठावठिकाणा लागला नाही. शनिवारी सकाळी शहरानजीकच्या एका विहिरीत एका मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. पोलिसांना माहिती देण्यात आली. शोध घेतला असता त्याच विहिरीत ज्योतीचेही प्रेत आढळून आले. पोलिसांनी पती खंडू शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दारव्हा तालुक्यातील जांभोरा येथे रंजना अशोक ढेकले (२५) या विवाहितेने शुक्रवारी रात्री १०.३० वाजता अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती ८० टक्के जळाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत पोलीस आले नव्हते. त्यामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत तिचे प्रेत घरीच होते. रंजनाला तीन मुली आहे. मूळचा पाटणबोरीचा प्रशांत संभाशिव चवलेवार (३६) रा.सुरजनगर यवतमाळ याने मध्यरात्री विष घेऊन बसस्थानक चौकातील भारत लॉजमध्ये आत्महत्या केली. तर अलकबीरनगरातील अब्दुल मन्नान अब्दुल मस्तान (६५) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उजेडात आली. (लोकमत चमू)