शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

सात प्रकल्प तुडुंब भरले, उन्हाळ्यातील पाणीटंचाई मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा जिल्ह्यात पाऊस धुव्वाधार बरसला. गेल्या दोन दिवसात तर सततच्या पावसाने जिल्ह्यातील महत्वाचे सात प्रकल्प तुडुंब झाले आहे. तर अन्य तीन मोठे प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार आहे. सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे. विविध ठिकाणच्या या प्रकल्पातून पुसद, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी अशा महत्वाच्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे प्रकल्प भरल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता जवळपास संपली आहे. पावसामुळे सध्या नुकसान सोसावे लागत असले तरी भविष्यात या पावसाचा जिल्ह्याला भरपूर फायदा होणार आहे. दरम्यान, अद्यापही विविध ठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण