शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता.

ठळक मुद्देआठवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या एक लाखांवर, केवळ २७ हजार विद्यार्थीच शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्यापही कोरोनाची भीती कायम असल्याचेच दिसून येते. जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या एक लाख दहा हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच शाळेत पोहोचले आहेत.कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता. १५ जुलै रोजी आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण ९८५ शाळांपैकी ५०२ शाळा सुरू झाल्या, तर ४८३ शाळांनी अद्यापही शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या ११ हजार ४७९ एवढी आहे. यातील ५०२ शाळा सुरू झाल्या असून या शाळेत केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच प्रत्यक्ष आल्याने विद्यार्थ्यांची मोठी संख्या शाळा सुरू होऊनही शाळेपासून अद्यापही दूर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ८९९ शाळांची संख्या असून त्यातील १८२ शाळा सुरू झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीचे एक लाख ९५ हजार ८०७ विद्यार्थी आहेत. यातील केवळ चार हजार ७४९ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या ३५६ शाळा असून त्यातील केवळ ३७ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील ६५ हजार ४८७ पैकी केवळ ९८७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झालेले आहेत.

उमरखेडमध्ये सर्वाधिक शाळा- आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापही ४८३ शाळांचे दरवाजे बंद आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ६२ शाळा उमरखेड तालुक्यात सुरू झाल्या आहेत. महागाव तालुक्यात ५२, यवतमाळ १७, राळेगाव ३५, पांढरकवडा ४९, वणी ३७, मारेगाव २५, बाभूळगाव २६, घाटंजी ४९, आर्णी ३२, नेर २७ तर दारव्हा तालुक्यात ३० शाळा सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी