शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता.

ठळक मुद्देआठवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या एक लाखांवर, केवळ २७ हजार विद्यार्थीच शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्यापही कोरोनाची भीती कायम असल्याचेच दिसून येते. जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या एक लाख दहा हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच शाळेत पोहोचले आहेत.कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता. १५ जुलै रोजी आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण ९८५ शाळांपैकी ५०२ शाळा सुरू झाल्या, तर ४८३ शाळांनी अद्यापही शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या ११ हजार ४७९ एवढी आहे. यातील ५०२ शाळा सुरू झाल्या असून या शाळेत केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच प्रत्यक्ष आल्याने विद्यार्थ्यांची मोठी संख्या शाळा सुरू होऊनही शाळेपासून अद्यापही दूर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ८९९ शाळांची संख्या असून त्यातील १८२ शाळा सुरू झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीचे एक लाख ९५ हजार ८०७ विद्यार्थी आहेत. यातील केवळ चार हजार ७४९ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या ३५६ शाळा असून त्यातील केवळ ३७ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील ६५ हजार ४८७ पैकी केवळ ९८७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झालेले आहेत.

उमरखेडमध्ये सर्वाधिक शाळा- आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापही ४८३ शाळांचे दरवाजे बंद आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ६२ शाळा उमरखेड तालुक्यात सुरू झाल्या आहेत. महागाव तालुक्यात ५२, यवतमाळ १७, राळेगाव ३५, पांढरकवडा ४९, वणी ३७, मारेगाव २५, बाभूळगाव २६, घाटंजी ४९, आर्णी ३२, नेर २७ तर दारव्हा तालुक्यात ३० शाळा सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी