शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सोशल मीडियावर शिष्यवृत्तीचा बनावट मॅसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:19 IST

दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेची थट्टा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालिकेत हेलपाटे, प्रशासन त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे. पालिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावता-समजावता नाकीनऊ येत आहे.नुकताच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तत्पूर्वी सीबीएसईचा दहावीचा आणि बारावीचाही निकाल लागला आहे. तीच संधी साधून व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांना आमिष दाखविणारा बनावट मेसेज फिरविला जात आहे. प्रत्यक्षात अशी कुठलीही शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात नाही.परंतु, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना असल्याची अफवा व्हॉट्सअपवर पसरत आहे. विशेष म्हणजे, ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नगरपालिकेतून अर्ज भरावा लागेल, असे सांगितले जात असल्याने शहरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज नगरपालिकेत चकरा मारत आहेत. दररोज १०-१५ पालक पालिकेत येऊन अर्ज मागतात. कर्मचारी त्यांना अशी शिष्यवृत्तीच नसल्याचे समजावून सांगतात. मात्र हे पालक आपल्या नगरसेवकांना घेऊन येतात. त्यामुळे अखेर यवतमाळ नगरपालिकेला त्यासंदर्भात फलक लावावे लागले. प्रत्यक्षात कुठल्याही शिष्यवृत्तीचे अर्ज शाळास्तरावरूनच भरावे लागतात. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. निकाल लागताच हा मेसेज व्हायरल केला जातो. मात्र, पालकांनी त्यातील फोलपणा समजून घ्यावा, असे आवाहन पालिकेचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी केले.हाच तो बनावट संदेश‘दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष माहिती कळविण्यात येते की, शासनाने मा. अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने यांच्या नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ज्या मुलांनी दहावीमध्ये ५० टक्के मार्क मिळविले, त्यांना ११ हजार रुपये आणि ज्यांनी बारावीत ६० टक्के मार्क मिळविले, त्यांना २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळविता येईल. त्यासाठी लागणारे फॉर्म व माहिती आपल्या जवळील महानगरपालिका, नगरपालिकेत मिळेल.’ हाच तो बनावट संदेश आहे. दहावी, बारावीचे निकाल लागताच तो व्हायरल झाला आहे.