शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर शिष्यवृत्तीचा बनावट मॅसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:19 IST

दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेची थट्टा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालिकेत हेलपाटे, प्रशासन त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीत ५० टक्के गुण मिळाल्याबरोबर ११ हजारांची आणि बारावीत ६० टक्के गुण मिळाल्याबरोबर २० हजारांची शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी नगरपालिकेत जाऊन अर्ज भरा... असा बनावट मेसेज सध्या सोशन मीडियात व्हायरल झाला आहे. या अफवेने यवतमाळ नगरपालिका प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडत आहे. पालिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावता-समजावता नाकीनऊ येत आहे.नुकताच राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तत्पूर्वी सीबीएसईचा दहावीचा आणि बारावीचाही निकाल लागला आहे. तीच संधी साधून व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांना आमिष दाखविणारा बनावट मेसेज फिरविला जात आहे. प्रत्यक्षात अशी कुठलीही शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात नाही.परंतु, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना असल्याची अफवा व्हॉट्सअपवर पसरत आहे. विशेष म्हणजे, ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नगरपालिकेतून अर्ज भरावा लागेल, असे सांगितले जात असल्याने शहरातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज नगरपालिकेत चकरा मारत आहेत. दररोज १०-१५ पालक पालिकेत येऊन अर्ज मागतात. कर्मचारी त्यांना अशी शिष्यवृत्तीच नसल्याचे समजावून सांगतात. मात्र हे पालक आपल्या नगरसेवकांना घेऊन येतात. त्यामुळे अखेर यवतमाळ नगरपालिकेला त्यासंदर्भात फलक लावावे लागले. प्रत्यक्षात कुठल्याही शिष्यवृत्तीचे अर्ज शाळास्तरावरूनच भरावे लागतात. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. निकाल लागताच हा मेसेज व्हायरल केला जातो. मात्र, पालकांनी त्यातील फोलपणा समजून घ्यावा, असे आवाहन पालिकेचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी केले.हाच तो बनावट संदेश‘दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष माहिती कळविण्यात येते की, शासनाने मा. अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने यांच्या नावाने नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ज्या मुलांनी दहावीमध्ये ५० टक्के मार्क मिळविले, त्यांना ११ हजार रुपये आणि ज्यांनी बारावीत ६० टक्के मार्क मिळविले, त्यांना २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळविता येईल. त्यासाठी लागणारे फॉर्म व माहिती आपल्या जवळील महानगरपालिका, नगरपालिकेत मिळेल.’ हाच तो बनावट संदेश आहे. दहावी, बारावीचे निकाल लागताच तो व्हायरल झाला आहे.