शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 9:44 PM

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : शेतमालाचे भाव वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले.सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. दुष्काळी स्थितीवर उपाययोजना झाल्या नाही. तत्काळ १० हजार रुपयांची एकरी मदत जाहीर करण्यात यावी. एकरी ५० हजारांचे पीककर्ज मंजूर करण्यात यावे. गाय पाळण्यासाठी शासनाकडून गोपालन भत्ता देण्यात यावा. शेतमालास संरक्षण देण्यात यावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत आणि वेतन आयोगाच्या धर्तीवर भाव देण्यात यावा. यासह विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे, सचिन मनवर, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, विपीन कवाडे, अनिकेत मेश्राम, विजय कदम, शुभम पातोडे, विक्की मेंढे, गौरव बहेकर, अंकीत कुटे, स्वप्नील खोब्रागडे, कुंदन निखाडे, अमोल पावडे उपस्थित होते.सरकारच्या केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारेच गप्पाराज्य शासनाने दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात कुठलाही विषय गांभीर्याने घेतला नाही. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे धन्यता मानल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दुष्काळी तालुक्याची होरपळ वाढली आहे. पाण्यासाठी दहादिशा भटकण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे. चारा छावण्यांचा पत्ता नसल्याने पशुपालकांसमोर चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतरही जिल्ह्यात चारा छावणी सुरू झाली नाही.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड