शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

ग्रामीण रस्त्यांची रुंदी केवळ तीन मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 1:46 AM

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात नव्याने बांधल्या जात असलेल्या रस्त्यांची रुंदी पाऊण मीटरने घटवून चक्क तीन मीटर करण्यात आली आहे. एवढ्या कमी रुंदीच्या रस्त्यावरून दोन वाहने एकाच वेळी पास होणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पाऊण मीटरने रुंदी घटविली, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात नव्याने बांधल्या जात असलेल्या रस्त्यांची रुंदी पाऊण मीटरने घटवून चक्क तीन मीटर करण्यात आली आहे. एवढ्या कमी रुंदीच्या रस्त्यावरून दोन वाहने एकाच वेळी पास होणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या (पीएमजीएसवाय) धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (एमएमजीएसवाय) सुरू करण्यात आली. एमएमजीएसवायचे प्रत्येक काम हे पीएमजीएसवायच्या धर्तीवर करावे, त्याचेच नियम पाळावे, असे बंधन घातले गेले आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम करताना हे नियम दुर्लक्षित केले जात असल्याचे सांगितले जाते. नियमानुसार, ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गांची रुंदी किमान ३.७५ मीटर असणे बंधनकारक आहे. परंतु मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधल्या जात असलेल्या अनेक रस्त्यांची रुंदी अवघी तीन मीटरवर मर्यादित करण्यात आली आहे. ही रुंदी पाऊण मीटरने घटविण्यामागे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नाही.वास्तविक तीन मीटरचा रस्ता हा प्रकारच कालबाह्य झाला आहे. दोन ट्रक पास होण्यासाठी साडेपाच मीटर रुंदी गरजेची असताना तीन मीटर ग्रामीण रस्त्यावरून ट्रक पास होणार कसे, हाच मूळ प्रश्न आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधीची कमतरता नाही. रस्त्यांना ३० लाखांपासून ८० लाखापर्यंत प्रतिकिलोमीटर दर दिला जातो. असे असताना ग्रामीण रस्त्यांची रुंदी घटविल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. ग्रामीण रस्त्यांची रुंदी घटविली गेली असतानाही जिल्हा परिषदेचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ राजकारणातच मशगुल असलेल्या जिल्हा परिषदेला घटलेल्या रस्त्याच्या रुंदीचे सोयरसूतक नसल्याचे दिसते.एक पाऊल मागे कसे ?कोणतीही योजना अपग्रेड होणे, त्याचे एक पाऊल पुढे पडणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना एक पाऊल पुढे जाण्याऐवजी मागे येत असल्याचे रस्त्याच्या घटविल्या गेलेल्या रुंदीवरून दिसून येते. पावणे चार मीटरचा ग्रामीण रस्ता तीन मीटर रुंदीवर आणून काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची संपूर्ण अंमलबजावणी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या नियम व निकषानुसारच करण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील एक्सपर्ट व जागरुक नागरिकांमधून पुढे आली आहे.