५७ कोटींच्या वसुलीसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:24+5:30

औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

Run for recovery of Rs 57 crore | ५७ कोटींच्या वसुलीसाठी धावाधाव

५७ कोटींच्या वसुलीसाठी धावाधाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज वितरण कंपनीने विविध भागामध्ये वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ केला आहे. यातून वीज बिल वसुली वाढली आहे. मात्र काही ठिकाणी अतिरेक झाल्याने नागरिकांकडून ओरडही हाेत आहे. 
कंपनीचे विविध ग्राहकांकडे ५७ कोटी ३१ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १४ कोटी ५८ लाख थकले आहे. याशिवाय औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

शासकीय कार्यालयाने चिंता वाढविली
- शासकीय कार्यालयांना प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी निधी वळता केला जातो. यानंतरही या कार्यालयाकडे वीज बिलाची थकबाकी पाहायला मिळत आहे. तब्बल दीड कोटी या कार्यालयांकडे थकले आहे.

अनेकांवर दंड आकारला

वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलाची वसुली करताना वीज कनेक्शन कापले आहे. यात मोठा दंडही केला आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहे. 
ढाणकी नगरपंचायतीमध्ये गावातले स्ट्रिट लाईटच वीज कंपनीने काढून नेले आहे. गाव अंधारात बुडाले आहे.

४२६० थकबाकीदारांची वीज कापली
गत तीन महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने चार हजार २६० ग्राहकांकडील वीज कापली आहे. या ठिकाणी वारंवार सूचना दिल्यानंतरही थकीत बिलाचे पैसे मिळाले नाही. यामुळे वीज कंपनीने अखेरची कारवाई म्हणून हे पाऊल उचलले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. 

सर्वसामान्य काय म्हणतात

आजपर्यंत आमच्यावर साडेचार कोटी रुपयांचे वीज बिल थकले. मात्र नगरपंचायत आल्यापासून नियमित परतफेड होत आहे. यानंतरही स्ट्रिट लाईट काढले.
- संतोष पुरी, नगरसेवक

लाईन नसेल तर शेती करणे अशक्य आहे. भर उन्हात पीक करपत आहे. अशा परिस्थितीत त्याला वीज प्रवाह मिळाला नाही तर हाती आलेले पीकही वाया जाते. 
- जगदीश चव्हाण, शेतकरी 

दोन बिले थकली तर वीज कापणार 
वीज कपंनीने वीज वसुलीसाठी काही नियम तयार केले आहे. त्याचप्रमाणे वीज बिल जर थकले तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दोन बिलांचा अवधी देण्यात आला आहे.
 

 

Web Title: Run for recovery of Rs 57 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज