शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:00 PM

यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : मदतीची प्रतीक्षा, नव्या हंगामासाठी पैैशाची जुळवाजुळव

आॅनलाईन लोकमतवणी : यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शासनस्तरावर बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याच्या गप्पा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहचेल, याबाबत संभ्रम आहे.यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केली. एनडीआरएफमार्फत बोंडअळीग्रस्त शेताची पाहणी करून त्यानंतर शेतकºयांना मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र या मदतीला ‘कर्जमाफी’चे स्वरूप तर येणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्रत्यक्षात एक खडकूही शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा झाला नाही, हे विशेष. यंदा बोंडअळीच्या संकटाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. त्यात बिटी बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा वणी तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र कधी नव्हे ईतका बोंडअळीचा प्रकोप झाल्याने एका वेचणीनंतरच कपाशी उद्ध्वस्त झाली. दरवर्षी फेबु्रवारीपर्यंत शेतात कापसाची झाडे उभी असतात.यादरम्यान, दहापेक्षा अधिक कापूस वेचण्या होतात. मात्र यावर्षी एका कापूस वेचणीनंतरच सर्वच कापूस बोंडांना गुलाबी बोंडअळीने पोखरून टाकले. विशेष म्हणजे ही अळी बोंडात शिरून स्वत:च्या विष्ठेने बोंडाची सुक्ष्म छित्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर कोणत्याही औैषधांची फवारणी केली तरी त्याचा परिणाम अळीवर होत नाही. कृषी विभागाकडून वारंवार फवारणीचा सल्ला देण्यात आला. मात्र ही फवारणी कुचकामी ठरली. ही अळी सहा महिन्यांपर्यंत कोष करून त्यात जीवंत राहू शकते. त्यामुळे कपाशीची झाडे जाळून टाकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. त्यामुळे बोंडअळीचा नायनाट होईल, असा दावा केला जात आहे.कपाशीवर नांगर फिरवून रबीची तयारीकपाशीचे पीक हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकºयांनी रबी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांचे शेत मात्र खरीप हंगामापर्यंत मोकळे राहणार आहे. एकूणच यावर्षी आलेल्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशीचे उत्पादनही निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने, कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.