शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दहा हजार कोटींच्या रस्त्यांवर रोड इंजिनिअरची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:57 AM

‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत.

ठळक मुद्दे‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’खासगी कन्सलटंट तपासणार दर्जाबांधकामच्या ‘क्वॉलिटी कंट्रोल’वर अविश्वास

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत.‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’मधून ३० हजार कोटींच्या रस्त्यांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटींचे रस्ते बांधले जात आहे. बड्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली आहे. बांधकामांच्या दर्जा व गुणवत्तेवर नजर ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण (क्वॉलिटी कंट्रोल) विभागाकडे आहे. परंतु ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीचे अधिकार क्वॉलिटी कंट्रोलवर अविश्वास दाखवित त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. त्याऐवजी खासगी कन्सलटंटकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांचे रोड इंजिनिअर या रस्त्यांची गुणवत्ता तपासणार आहे. अर्थात हे इंजिनिअर शासन व कंत्राटदार यांच्यात दुवा म्हणून काम करणार आहे. बिल बनविणे, मोजमाप घेणे ही कामेही ते करणार आहेत.

‘कन्सलटंट’वर शेकडो कोटींची उधळपट्टीखासगी कन्सलटंटकडे गुणवत्ता तपासणीची जबाबदारी दिल्याने दहा हजार कोटींच्या रस्त्यांचा दर्जा खरोखरच सांभाळला जाणार का याबाबत साशंकता आहे. कारण शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोल विभागातील अभियंत्यांना कारवाईची, नोकरी जाण्याची भीती असते, यामुळे ते क्वॉलिटीसोबत शंभर टक्के तडजोड करीत नाही. या उलट स्थिती खासगी कन्सलटंटच्या इंजिनिअरची राहू शकते. या कन्सलटंट व इंजिनिअरवर ५०० कोटी पेक्षा अधिक रक्कम शासनाच्या तिजोरीतून खर्च केली जाणार असल्याची माहिती आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या सर्वेक्षणावरही अशाच पद्धतीने ५०० ते ७०० कोटी रुपये खर्च केले गेले होते.

निवृत्त बांधकाम अभियंतेच कन्सलटंटकडेसार्वजनिक बांधकाम खात्यातून निवृत्त झालेल्या अभियंत्यांचाच कन्सलटंटकडे भरणा आहे. एकीकडे ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या नावाने बांधकाम खात्याकडील कामे कमी केली, तर दुसरीकडे बांधकाम खात्याचेच अभियंते खासगी कन्सलटंटसाठी तीच कामे करीत आहे. आजच्या घडीला बांधकाम खात्याच्या क्वॉलिटी कंट्रोलकडे फारसे काम उरलेले नाही. बहुतांश जबाबदारी खासगी कन्सलटंटच्या रोड इंजिनिअरकडे देण्यात आली आहे. असे असताना पुन्हा राज्य लोकसेवा आयोगामार्फत बांधकाम व सिंचन विभागासाठी ४०० अभियंत्यांची नोकरभरती केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.‘बीग बजेट’ कामांमुळे सर्वच खूष‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’त खासगी कन्सलटंट बजेट वाढवून देत असल्याने शासनाच्या तिजोरीवर बोझा वाढत असला तरी राजकीय पदाधिकारी मात्र आपल्या मतदारसंघात मोठ्या रकमेचे काम आले म्हणून खूश असतात. शिवाय बजेटनुसार ‘मार्जीन’ही वाढत असल्याने सर्व संबंधितांची त्याला मूकसंमती असते.करारनाम्यात दडपले गैरप्रकार‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या करारनाम्यातच अनेक गैरप्रकार दडपले गेले आहे. हे करारनामे कुणी वाचले नाही किंवा या कामांचे प्रशिक्षण दिले गेले नाही. वास्तविक करारनामे योग्य आहे की नाही याची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमार्फत होणे अपेक्षित होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक