शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:28 PM

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपुनर्गठनाचे शासन स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पाच तालुक्यांत विस्तार असलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे चाक मागील तीन हंगामापासून फिरले नाही. त्यामुळे सहकारी तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव साखर कारखाना ही वसंतची ओळख आता मिटली आहे. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड.माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड.माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वपक्षीय संचालक मंडळाने देखील त्यांना सहकार्य केले. मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.१२० कोटींपैकी बँकेच्या २० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. मुंबईला जाऊन या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी आपले राजीनामे कार्यकारी संचालक अरूण भालेराव यांच्याकडे सोपविले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. कारखाना सुरू होणार नसल्याने त्याचे पडसाद या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जाते.युती सरकार शेतकरी विरोधी - मानेकारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन न करणारे राज्यातील भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी करून भाजपला घरचा अहेर दिला आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्ही हताश झालो अशी प्रतिक्रिया माने यांनी नोंदविली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने