शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१९७५ च्या मदतीची कोरोनात परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले.

ठळक मुद्देओल्या दुष्काळाचे सावट, दोन दिवसांपासून उपाशी होती वटफळी गावातील भावंड

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : महाराष्ट्रात १९७५ साली ओला दुष्काळ पडला होता. या दुष्काळात लोकांना कित्येक दिवस स्वत:च्या घरातच काढावे लागले. अशावेळी वटफळीतील दानशूर गोविंदा उर्फ साधू नगराळे यांनी गोविंद वाकडे यांच्या गरीब कुटुंबीयांना पोळ्याच्या सणाला एक ग्लास ज्वारीच्या कण्या देऊन जीवदान दिले होते. त्याची परतफेड म्हणून गोविंदराव वाकडे यांचा मुलगा अंकुश वाकडे यांनी साधू नगराळे यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये स्वत: वटफळीला जाऊन धान्याची मदत केली.गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले. आज या घटनेला ४५ वर्ष झाली. त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे वटफळीत वास्तव्याला आहे. त्याची परिस्थिती जेमतेम आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन जीवघेण्याप्रसंगात यवतमाळमध्ये रहिवासी असलेले अंकुश वाकडे यांनी वटफळी येथे जाऊन नगराळे कुटुंबाला मदतीचा हात दिला. धान्याची कीट देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तरनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल तायडे उपस्थित होते.लाखमोलाची मदतमी तीन वर्षांचा असताना माझ्या परिवाराला साधू उर्फ गोविंदराव नगराळे व त्यांच्या पत्नी अलकाबाई नगराळे यांनी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्या ज्वारीच्या कण्या मिळाल्या नसत्या तर आम्ही तिन्ही भावंड जगलो नसतो. त्यामुळे त्या मदतीची परतफेड म्हणून मी त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना मदत केली आहे. या परिस्थितीत ही मदत करणे मला मोलाचे वाटले, असे मत प्रा अंकूश वाकडे यांनी व्यक्त केले.सामाजिक जबाबदारीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रोजगार, मजुरी बुडत आहे. जवळ असलेला पैसा, घरातील अन्नधान्य संपत आले आहे. त्यांच्यापुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. अशावेळी मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. ग्रामीण भागातही आपापल्यापरीने मदत करीत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस