शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

१९७५ च्या मदतीची कोरोनात परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले.

ठळक मुद्देओल्या दुष्काळाचे सावट, दोन दिवसांपासून उपाशी होती वटफळी गावातील भावंड

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : महाराष्ट्रात १९७५ साली ओला दुष्काळ पडला होता. या दुष्काळात लोकांना कित्येक दिवस स्वत:च्या घरातच काढावे लागले. अशावेळी वटफळीतील दानशूर गोविंदा उर्फ साधू नगराळे यांनी गोविंद वाकडे यांच्या गरीब कुटुंबीयांना पोळ्याच्या सणाला एक ग्लास ज्वारीच्या कण्या देऊन जीवदान दिले होते. त्याची परतफेड म्हणून गोविंदराव वाकडे यांचा मुलगा अंकुश वाकडे यांनी साधू नगराळे यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये स्वत: वटफळीला जाऊन धान्याची मदत केली.गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले. आज या घटनेला ४५ वर्ष झाली. त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे वटफळीत वास्तव्याला आहे. त्याची परिस्थिती जेमतेम आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन जीवघेण्याप्रसंगात यवतमाळमध्ये रहिवासी असलेले अंकुश वाकडे यांनी वटफळी येथे जाऊन नगराळे कुटुंबाला मदतीचा हात दिला. धान्याची कीट देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तरनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल तायडे उपस्थित होते.लाखमोलाची मदतमी तीन वर्षांचा असताना माझ्या परिवाराला साधू उर्फ गोविंदराव नगराळे व त्यांच्या पत्नी अलकाबाई नगराळे यांनी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्या ज्वारीच्या कण्या मिळाल्या नसत्या तर आम्ही तिन्ही भावंड जगलो नसतो. त्यामुळे त्या मदतीची परतफेड म्हणून मी त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना मदत केली आहे. या परिस्थितीत ही मदत करणे मला मोलाचे वाटले, असे मत प्रा अंकूश वाकडे यांनी व्यक्त केले.सामाजिक जबाबदारीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रोजगार, मजुरी बुडत आहे. जवळ असलेला पैसा, घरातील अन्नधान्य संपत आले आहे. त्यांच्यापुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. अशावेळी मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. ग्रामीण भागातही आपापल्यापरीने मदत करीत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस