शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्हा परिषदेला विद्यार्थिनीच्या सुरक्षेचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:06 IST

विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचायतराज समितीच्या दौऱ्याचा धसका : शाळांमध्ये अचानक तक्रारपेट्या दिसू लागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.गेल्या वर्षी मे महिन्यातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला याबाबत आदेश दिला होता. जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही मुलींसाठी तक्रारपेटी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने गेले वर्षभर या आदेशावरील धूळ झटकली नाही. तक्रारपेटीचा विषय किरकोळ मानून केराच्या टोपलीत टाकण्यात आला.आता २९ आॅगस्टपासून तीन दिवस पंचायतराज समिती जिल्हा परिषदेची झाडाझडती घेणार आहे. यात सर्वाधिक कर्मचारी असलेला शिक्षण विभागच प्रामुख्याने पीआरसीच्या अजेंड्यावर राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही शाळांनाही समिती प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचे कळते. यात तक्रार पेटीबाबतचे दुर्लक्ष पीआरसीच्या नजरेत येण्याची दाट भीती आहे. म्हणूनच शिक्षणाधिकाºयांनी सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना तातडीने तक्रार पेट्या बसवून घेण्याचे आदेश दिलेआहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी