शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

दुष्काळातही ६० हजार शेतकऱ्यांची नियमित कर्ज परतफेड

By admin | Updated: December 24, 2014 23:06 IST

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के

जिल्हा बँक : शून्य टक्के व्याज आणि दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के व्याज आणि दरवर्षी दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी १ लाख ८० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करते. मात्र यातील अनेक शेतकरी दरवर्षीच शासन माफी देईल, कर्जाचे पुनर्गठण होईल या प्रतीक्षेत असतात. पर्यायाने ते थकबाकीदार होतात. जिल्हा बँकेचे तब्बल १ लाख २० हजार शेतकरी थकबाकीदार असले तरी ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारेही आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीदार होणेच मुळात आवडत नाही. कर्जाची वेळेत अर्थात पिकावर परतफेड करायचीच या इराद्याने ते दरवर्षी कर्ज घेतात आणि भरतातसुद्धा. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यासाठी नापिकी, दुष्काळ, कौटुंबिक गरजा, वाढलेला उत्पादन खर्च या सारखी कारणे सांगितली जात आहे. मात्र या कोणत्याही कारणांचा परिणाम उपरोक्त ६० हजार शेतकऱ्यांवर कधी झाला नाही. विपरीत परिस्थितीतही हे शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले नाहीत. दुष्काळातही त्यांचे अर्थचक्र प्रभावित झाले नाही. याच ६० हजार शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज परतफेडीवर बँकेचे इतरांच्या कर्ज वाटपाचे रोटेशन सुरू असल्याचे बँकेतून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थिती आणि ४६ टक्के पैसेवारीमुळे शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाला मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जाणार आहे. मात्र ६० हजार शेतकरी याचा लाभ घेत नाहीत. माफीच्या वर्षातही या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित परतफेड केले. यात सधनच नव्हे तर सामान्य शेतकऱ्यांचीही संख्या बरीच मोठी असल्याचे सांगितले गेले. नियमित कर्ज भरणाऱ्या या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. शिवाय कर्जाच्या रकमेत १० टक्के वाढही केली जाते. तरीही बँकेचे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी ही कर्ज वसुली ३५० कोटींवर पोहोचली होती. यावर्षी ती १०० कोटींनी कमी होऊन अडीचशे कोटींवर येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. एकट्या मार्च महिन्याच्या अखेरीस दीडशे कोटी रुपये वसूल होतील, असा बँकेचा अंदाज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)