शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही ६० हजार शेतकऱ्यांची नियमित कर्ज परतफेड

By admin | Updated: December 24, 2014 23:06 IST

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के

जिल्हा बँक : शून्य टक्के व्याज आणि दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के व्याज आणि दरवर्षी दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी १ लाख ८० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करते. मात्र यातील अनेक शेतकरी दरवर्षीच शासन माफी देईल, कर्जाचे पुनर्गठण होईल या प्रतीक्षेत असतात. पर्यायाने ते थकबाकीदार होतात. जिल्हा बँकेचे तब्बल १ लाख २० हजार शेतकरी थकबाकीदार असले तरी ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारेही आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीदार होणेच मुळात आवडत नाही. कर्जाची वेळेत अर्थात पिकावर परतफेड करायचीच या इराद्याने ते दरवर्षी कर्ज घेतात आणि भरतातसुद्धा. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यासाठी नापिकी, दुष्काळ, कौटुंबिक गरजा, वाढलेला उत्पादन खर्च या सारखी कारणे सांगितली जात आहे. मात्र या कोणत्याही कारणांचा परिणाम उपरोक्त ६० हजार शेतकऱ्यांवर कधी झाला नाही. विपरीत परिस्थितीतही हे शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले नाहीत. दुष्काळातही त्यांचे अर्थचक्र प्रभावित झाले नाही. याच ६० हजार शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज परतफेडीवर बँकेचे इतरांच्या कर्ज वाटपाचे रोटेशन सुरू असल्याचे बँकेतून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थिती आणि ४६ टक्के पैसेवारीमुळे शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाला मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जाणार आहे. मात्र ६० हजार शेतकरी याचा लाभ घेत नाहीत. माफीच्या वर्षातही या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित परतफेड केले. यात सधनच नव्हे तर सामान्य शेतकऱ्यांचीही संख्या बरीच मोठी असल्याचे सांगितले गेले. नियमित कर्ज भरणाऱ्या या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. शिवाय कर्जाच्या रकमेत १० टक्के वाढही केली जाते. तरीही बँकेचे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी ही कर्ज वसुली ३५० कोटींवर पोहोचली होती. यावर्षी ती १०० कोटींनी कमी होऊन अडीचशे कोटींवर येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. एकट्या मार्च महिन्याच्या अखेरीस दीडशे कोटी रुपये वसूल होतील, असा बँकेचा अंदाज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)