शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘एमटी’च्या फौजदार भरतीतून शिपाई-जमादार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 14:05 IST

पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात घेण्यात येत असलेल्या उपनिरीक्षक पदाच्या भरतीतून शिपाई-जमादारांना बाद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे.

ठळक मुद्दे५४ वर्षांपूर्वीची नियमावली उच्चशिक्षित असूनही संधी नाही

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात घेण्यात येत असलेल्या उपनिरीक्षक पदाच्या भरतीतून शिपाई-जमादारांना बाद करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील ‘एमटी’ महानिरीक्षक कार्यालयाच्या कारभाराविरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे.पोलीस मोटर परिवहन विभागात फौजदाराच्या ३० ते ३५ जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. ही भरती १९६४ च्या नियमानुसार घेतली जात आहे. वास्तविक नव्या प्रचलित नियमानुसार भरती घ्यावी म्हणून पुण्याच्या ‘एमटी’ महानिरीक्षकांनी महासंचालकांकडे प्रस्ताव पाठविला. परंतु त्यावरील निर्णय येण्यापूर्वीच भरतीची जाहिरात काढण्यात आली. या जुन्या नियमानुसार केवळ सहायक फौजदार (एएसआय) या भरतीसाठी पात्र ठरत आहेत. त्यात डिझेल व मोटर मेकॅनिक हा निकष असताना आता त्यात ट्रॅक्टर मेकॅनिक हा नवा निकष जोडण्यात आला आहे. या भरतीसाठी सध्या पात्र ठरत असलेल्या एएसआयने केवळ आयटीआय केले आहे.जुन्या नियमामुळे फौजदाराच्या या भरतीतून पोलीस मोटर परिवहन विभागातील शिपाई-जमादार बाद ठरले आहेत. वास्तविक अनेक शिपाई-जमादार पदविकाधारक आहेत. काहींनी त्यापेक्षाही उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांचा अनुभवही दीर्घ आहे. त्यानंतरही त्यांना फौजदार होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. महानिरीक्षकांच्यास्तरावरच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी ५ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.यापूर्वी २००८ मध्ये फौजदार पदासाठी अशीच भरती घेतली गेली. त्या भरतीमध्ये प्रचंड घोटाळा करण्यात आला. त्या भरतीबाबत महासंचालकांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या भरतीत प्रचंड मोठी ‘उलाढाल’ झाल्याचे सांगितले जाते. दहा वर्षांनंतर आता त्या भरतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फौजदारपदाच्या भरतीपासून वंचित झालेल्या ‘एमटी’च्या शिपाई-जमादारांना नव्या प्रचलित नियमानुसार परीक्षेची संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यभरातून केली जात आहे.‘एमटी’च्या घोटाळ्यांपुढे तक्रारकर्ता हतबलपोलीस मोटर परिवहन विभागात राज्यभरात ठिकठिकाणी गैरव्यवहार झाले आहेत. वाहनांच्या बोगस सुट्या पार्टची खरेदी, जुन्या वाहनांवर वारंवार दुरुस्ती दाखविणे या माध्यमातून कोट्यवधींचे घोटाळे केले गेले. त्याच्या तक्रारी महासंचालकांपासून उच्च न्यायालयापर्यंत याचिकांच्या माध्यमातून झाल्या. एसीबी व सीआयडीमार्फत चौकशीही झाली. दोन-तीन ठिकाणी दाखल झालेले गुन्हे वगळता कुठेही ठोस कारवाई झाली नाही. उलट घोटाळ्यात सहभागी अधिकाºयांना बढती दिली गेली. काही वर्षांपूर्वी झालेले घोटाळे ‘एमटी’मध्ये आजही पूर्वीप्रमाणेच राज्यभर राजरोसपणे सुरू आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. हिच संधी साधून ‘टेक्नीकल’च्या आडोशाने शासनाच्या कोट्यवधींच्या निधीची लूट सुरू आहे. या घोटाळ्याला वाचा फोडणारा सेवानिवृत्त उपअधीक्षकसुद्धा गृहखात्याच्या संरक्षण देण्याच्या भूमिकेपुढे हतबल झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :Policeपोलिस