शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:46 IST

Yavatmal : निकाल घोषित होऊनही २,४८८ पदांवर नियुक्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेसा क्षेत्रात १७ संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया राबवली होती. यात ७ ते ८ संवर्गातीलच पदे शासनाने भरली. इतर संवर्गातील सहा हजार ९३१ पदे आजपर्यंत भरली नाहीत. दोन हजार ४८८ पदांचा निकाल घोषित आहे. तर तीन हजार ६९३ पदांचा निकाल तयार असला तरी तो राखून ठेवला आहे. यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे.

शासनाने पेसा क्षेत्रात तलाठी ५७४, ग्रामसेवक ४२२, अंगणवाडी पर्यवेक्षक ५७, शिक्षक एक हजार ५४४, कृषी सहायक ३६५, पशुधन पर्यवेक्षक १२९, परिचारिका एक हजार ३८४, आरोग्यसेवक ग्रामविकास विभाग ५८३, सार्वजनिक आरोग्य विभाग २४१, वनरक्षक ८८२, कोतवाल ८४ आणि पोलिस पाटलांच्या ६६६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला; परंतु तलाठी ५७४, शिक्षक एक हजार ५४४, पशुधन पर्यवेक्षक १२९, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग २४१ अशा दोन हजार ४८८ पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. तीन हजार ६९३ पदसंख्येचा निकालही तयार आहे; मात्र आजपर्यंत तो घोषित केला नाही. त्यामुळे ४२२ ग्रामसेवक, ३६५ कृषी सहायक, एक हजार ३८४ परिचारिका, ५८३ आरोग्यसेवक ग्रामविकास तर ८८२ वनरक्षक पदाच्या नोकरीपासून आदिवासींना वंचित राहावे लागत आहे. 

सचिवांनी घेतली बैठक

  • पेसा क्षेत्रातील पदभरतीचा विषय विधानसभेतही गाजला. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व सहायक आयुक्तांची ९ जुलै रोजी व्हीसी घेतली.
  • यात मागासवर्ग कक्षामार्फत किती संवर्गातील बिंदू नामावली तपासली आणि आरक्षणानुसार पदभरतीची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला.
  • दरम्यान, शनिवारी यवतमाळात धरती आबा अभियान कार्यक्रमावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी महिनाभरात १०० टक्के पदे भरणार असल्याचे सांगितले.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ