शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:46 IST

Yavatmal : निकाल घोषित होऊनही २,४८८ पदांवर नियुक्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पेसा क्षेत्रात १७ संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया राबवली होती. यात ७ ते ८ संवर्गातीलच पदे शासनाने भरली. इतर संवर्गातील सहा हजार ९३१ पदे आजपर्यंत भरली नाहीत. दोन हजार ४८८ पदांचा निकाल घोषित आहे. तर तीन हजार ६९३ पदांचा निकाल तयार असला तरी तो राखून ठेवला आहे. यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे.

शासनाने पेसा क्षेत्रात तलाठी ५७४, ग्रामसेवक ४२२, अंगणवाडी पर्यवेक्षक ५७, शिक्षक एक हजार ५४४, कृषी सहायक ३६५, पशुधन पर्यवेक्षक १२९, परिचारिका एक हजार ३८४, आरोग्यसेवक ग्रामविकास विभाग ५८३, सार्वजनिक आरोग्य विभाग २४१, वनरक्षक ८८२, कोतवाल ८४ आणि पोलिस पाटलांच्या ६६६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला; परंतु तलाठी ५७४, शिक्षक एक हजार ५४४, पशुधन पर्यवेक्षक १२९, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग २४१ अशा दोन हजार ४८८ पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. तीन हजार ६९३ पदसंख्येचा निकालही तयार आहे; मात्र आजपर्यंत तो घोषित केला नाही. त्यामुळे ४२२ ग्रामसेवक, ३६५ कृषी सहायक, एक हजार ३८४ परिचारिका, ५८३ आरोग्यसेवक ग्रामविकास तर ८८२ वनरक्षक पदाच्या नोकरीपासून आदिवासींना वंचित राहावे लागत आहे. 

सचिवांनी घेतली बैठक

  • पेसा क्षेत्रातील पदभरतीचा विषय विधानसभेतही गाजला. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व सहायक आयुक्तांची ९ जुलै रोजी व्हीसी घेतली.
  • यात मागासवर्ग कक्षामार्फत किती संवर्गातील बिंदू नामावली तपासली आणि आरक्षणानुसार पदभरतीची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला.
  • दरम्यान, शनिवारी यवतमाळात धरती आबा अभियान कार्यक्रमावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी महिनाभरात १०० टक्के पदे भरणार असल्याचे सांगितले.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ