शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

गैरआदिवासींना दिलेले लाभ वसूल करा; केंद्र सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:26 AM

आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत.

ठळक मुद्दे बँका, रेल्वे, एलआयसी, वित्त कंपन्या, महामंडळातील कर्मचाऱ्यांवर बडगा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत. बँका, रेल्वे, एलआयसी, वित्तीय कंपन्या आणि महामंडळांतील गैरआदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर लागलेल्या कोष्टी, हलबा कोष्टी यांच्या नोकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने १० ऑगस्ट २०१० रोजी परिपत्रक जारी केले होते. या विरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने ९ जानेवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात केंद्राचे हे परिपत्रकच रद्द ठरविले. त्यामुळे सरकारला घटनाबाह्य असलेले आपलेच परिपत्रक ३० ऑगस्ट २०१८ रोजी मागे घ्यावे लागले आणि गैरआदिवासींवर कारवाई करण्याचे सर्व विभागांना आदेश द्यावे लागले.तरीही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर भारत सरकारच्या वित्त विभागाने १२ मार्च रोजी आपल्या अधिनस्त असलेले सर्व विभाग, सार्वजनिक बँका, रिझर्व्ह बँक, वित्तीय कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तर कार्मिक व प्रशिक्षण विभागानेही ८ एप्रिल रोजी परिपत्रक काढून अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर नोकरी मिळविणाऱ्या कोष्टी, हलबा कोष्टी जातीच्या कर्मचाऱ्यांना २८ नोव्हेंबर २००० पर्यंतच संरक्षण दिले. त्यानंतर मात्र अनुसूचित जमातीचे घेतलेले लाभ वसूल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता सर्वसाधारण प्रवर्गात शेवटच्या बिंदूनंतर धरावी, असे या आदेशात म्हटले आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगारांना फटकाकेंद्र सरकारकडून सर्व विभागांना गैरआदिवासी कर्मचाºयांवर कारवाईचे आदेश जारी झाले आहे. २८ नोव्हेंबर २००० पूर्वी अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर केंद्र सरकारच्या सेवेत लागलेल्या गैरआदिवासींचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त जागा प्रभावित होणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवकांना याचा जबर फटका बसणार आहे.

संघटना यासंदर्भात गेल्या १५ वर्षांपासून न्यायालयीन लढा लढत आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच दणका दिला आणि केंद्र सरकारलाही हा आदेश काढावा लागला. मात्र, अशा कर्मचाऱ्यांना २००० पर्यंत संरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्धही पुनर्विलोकन याचिका तयार आहे. त्याच्या खर्चाची तरतूद राज्य शासनाने करावी.- प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

टॅग्स :Governmentसरकार