शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

आदिवासी भगिनींच्या राख्या पोहोचल्या सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:22 IST

Yawatmal News आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधानांनी घेतली दखल४० देशांची पसंती

 

रूपेश उत्तरवार

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज विविध कलेच्या बाबतीत समृध्द आहे. आदिवासी आणि बांबूकला हा अविभाज्य अंग राहिला आहे. आदिवासींची ही कला जिवंत ठेवण्यासाठी लवादा (ता.धारणी, जि.अमरावती) येथे केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी आज जवळपास ४०० कारागीर बांबूच्या विविध वस्तू बनवित आहे. विशेष म्हणजे, आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.

पर्यावरण समृध्दीसाठी जगभरात काम हाेत आहे. याचाच एक भाग म्हणून आदिवासी समाजबांधव पुढे सरसावले आहे. पांढरकवडा आणि मेळघाट हा आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात. फ्लाॅवर पाॅट, पेपरवेट, घर, घड्याळ आणि इतर शोभेच्या वस्तू बनविण्यात आदिवसी बांधव तरबेज आहे. याच कलेला राखीची जोड देत बांबूपासून राखी बनविण्याचे मोठे काम महिलांनी हाती घेतले आहे.

गतवर्षी अशा ४० हजार राख्या बनविण्यात आल्या होत्या. या देशभरात विक्री करण्यात आल्या. आता ५० हजार राखीचे नियोजन त्यांनी केले आहे. बारीक कमच्यापासून बनविलेल्या या राख्या आदिवासी कारागिरांच्या उपजीविकेचे साधन झाले आहे. या राख्यांना आज राज्यासह विविध देशातून मागणी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेेतली. लवादच्या केंद्राची धुरा सुनील देशपांडे (दिवंगत) यांनी सांभाळली होती. आता त्यांच्या पत्नी निरुपमा देशपांडे या ही कला विकसित करण्यासाठी आणि आदिवासी समाजाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहे.

बालकांना आकर्षित करणारी कला

लवादा केंद्रातील महिलांनी विविध कलाकुसरीच्या राख्या तयार केल्या आहेत. बालकांना आकर्षित करेल, अशाही राख्या त्यांनी बनविल्या. याशिवाय मोर, स्वस्तिक, डोळे यासह काही शुभसंकेताचे चिन्ह प्रतिबिंबित करणाऱ्या राख्या घडविल्या आहेत.

 

आदिवासी महिलांनी तयार केलेली एक राखी विकली गेली तर एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते. दुर्गम भागातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून हे केंद्र काम करीत आहे. त्यातूनच बांबूपासून राख्यांची निर्मिती झाली आहे.

निरुपमा देशपांडे, अध्यक्ष, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा

टॅग्स :Rakhiराखी