ऐन पावसाळ्यात तापले ग्रामीण वातावरण

By Admin | Updated: June 28, 2015 00:08 IST2015-06-28T00:08:32+5:302015-06-28T00:08:32+5:30

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे.

In the rainy season, the rural climate is hot | ऐन पावसाळ्यात तापले ग्रामीण वातावरण

ऐन पावसाळ्यात तापले ग्रामीण वातावरण

ग्रामपंचायत निवडणूक : गावोगावी २५ जुलैला मतदान
वणी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे. काही गावांतील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने तेथील पुरूषांचे गणीत मात्र बिघडले आहे.
वणी तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ४२ गावांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांमध्ये महिला सरपंचपदी आरूढ झाल्या. तत्पूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंच पद आरक्षणाची सोडत झाली होती. सन २०२० पर्यंतसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर झाले.
आता दुसऱ्या टप्प्यात गोवारी, मोहदा, कृष्णानपूर, राजूर (कॉलरी), शिवणी, येनक, झोला, वडगाव, टाकळी, चिखली, परमडोह, चनाखा, नांदेपेरा, कळमना (खु.), निळापूर, तेजापूर, मुंगोली, साखरा-कोलगाव, निंबाळा (बु.), ढाकोरी, नेरड (पुरड), कुर्ली, वांजरी, बोरगाव, कोना, शेलू (खु.), चिलई, निंबाळा (खु.), कुंड्रा, भांदेवाडा, माथोली, पळसोनी, बाबापूर, पठारपूर, डोर्ली, गोवारी, बोरी, मजरा, खांदला आणि भुरकी येथे २५ जुलैला मतदान होणार आहे.
या गावांपैकी राजूर (कॉलरी), पठारपूर, नांदेपेरा, मोहदा, तेजापूर, नेरड, भादेवाडा आदी गावांतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. तेजापूर, राजूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष असते. यासोबत इतर १४ ग्रामपंचायतींमधील २७ रिक्त पदांसाठीही २५ जुलैला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे काही गावातील सत्ताधाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. (कार्यालय प्रतिनिधी)

वणी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यातच गावोगावचे वातावरण तापले आहे. काही गावांतील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने तेथील पुरूषांचे गणीत मात्र बिघडले आहे.
वणी तालुक्यात १०१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात ४० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ४२ गावांमध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांमध्ये महिला सरपंचपदी आरूढ झाल्या. तत्पूर्वी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंच पद आरक्षणाची सोडत झाली होती. सन २०२० पर्यंतसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी यापूर्वीच आरक्षण जाहीर झाले.
आता दुसऱ्या टप्प्यात गोवारी, मोहदा, कृष्णानपूर, राजूर (कॉलरी), शिवणी, येनक, झोला, वडगाव, टाकळी, चिखली, परमडोह, चनाखा, नांदेपेरा, कळमना (खु.), निळापूर, तेजापूर, मुंगोली, साखरा-कोलगाव, निंबाळा (बु.), ढाकोरी, नेरड (पुरड), कुर्ली, वांजरी, बोरगाव, कोना, शेलू (खु.), चिलई, निंबाळा (खु.), कुंड्रा, भांदेवाडा, माथोली, पळसोनी, बाबापूर, पठारपूर, डोर्ली, गोवारी, बोरी, मजरा, खांदला आणि भुरकी येथे २५ जुलैला मतदान होणार आहे.
या गावांपैकी राजूर (कॉलरी), पठारपूर, नांदेपेरा, मोहदा, तेजापूर, नेरड, भादेवाडा आदी गावांतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मूळ गाव आहे. तेजापूर, राजूर ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. त्यामुळे तेथील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष असते. यासोबत इतर १४ ग्रामपंचायतींमधील २७ रिक्त पदांसाठीही २५ जुलैला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे काही गावातील सत्ताधाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. (कार्यालय प्रतिनिधी)

मारेगाव तालुक्यात चार महिला सरपंच होणार
मारेगाव तालुक्यात ११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात आकापूर, आपटी, दांडगाव, हिवरा (मजरा), करणवाडी, मांगरूळ, कोलगाव, टाकळखेडा, टाकळी, कुंभा, इंदिराग्राम (नवीन) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात करणवाडी येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी इंदिराग्रामचे सरपंच पद आरक्षित आहे. आकापूर, टाकळखेडा येथील सरपंच पद सामान्य प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. मांगरूळ, दांडगाव, कुंभा येथील सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी आपटी, कोलगाव, हिवरा-मजरा, तर टाकळी येथील सरपंच पद सर्वसाधारण आहे. आता पावसाळा सुरू झाला असताना ११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी गटा-तटात विभागलेली गावे आता कुठे पूर्वपदावर आली. त्यातच पुन्हा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे पुन्हा गावा-गावात गटा-तटाचे राजकारण सुरू झाले आहे.

सरपंच पदाचे आरक्षण आधीच जाहीर
दुसऱ्या टप्प्यातील भांदेवाडा येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. टाकळी, पळसोनी, खांदला येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिला उमेदवारासाठी, तर झोला, बोरगाव येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. गोवारी-कोना, कुंड्रा, परमडोह, बोरी, निंबाळा (बु.) येथील सरपंचपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. कुर्ली, नेरड (पुरड), पठारपूर, ढाकोरी, नांदेपेरा, राजूर (कॉलरी), शेलू (खु.), मजरा, पुरड-पुनवट, चिलई, साखरा-कोलगाव येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे.

Web Title: In the rainy season, the rural climate is hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.