शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

दारव्हा तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:58 IST

जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : ४६८ मिमीची नोंद, अडाणमध्ये ५० टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.बुधवारपर्यंत एकूण ४६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला. त्याचबरोबर इतरही प्रकल्प व नदी, नाले, विहिरीमधील पाणीपातळी वाढली आहे. यावर्षी जून महिन्यात तालुक्यात पावसाचे आगमन झाले परंतु समाधानकारक बरसल्यानंतर मोठा खंड पडला. जुलै उजाडताच मात्र चांगला पाऊस पडला. ६ जुलैपासुन सारखा पाऊस सुरू आहे. ६ जुलैला २२ मिमी, ७ ला १० मिमी, १० ला ४४ मिमी तर ११ जुलैला ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत २४२ मिमी पाऊस पडला होता. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस झाला आहे. महत्वपूर्ण समजल्या जाणाºया म्हसणी येथील अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यासोबतच गोखी, अंतरगाव, कुंभारकिन्ही प्रकल्पातही पातळी वाढली आहे. गेल्या डिसेंबरपासून कोरडी पडलेली अडाण नदीसह नाले वाहायला लागले. टंचाईग्रस्त गावांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात लागवडीखाली एकूण ६३ हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकाखाली मोठ क्षेत्र आहे. समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली आहे मात्र सततच्या चिरी-चीरी पावसामुळे मात्र शेतीच्या कामात संथ गती अली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस