शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:00 AM

यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देअद्याप साडेचार हजार हेक्टर बाकी : गहू आणि हरभरावर जोर

  लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी केली आहे. त्यात गहू आणि हरभरासह विविध पिकांचा समावेश आहे. यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. अद्यापही चार ते चार हजार ५०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली नाही. कृषी विभागाने लवकरच ही पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी हरभरा पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या हरभरा खुडणीला आला आहे. काही ठिकाणी डवरणीसुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिकांना दोन पाळ्यांमध्ये पाणी दिले आहे. काही परिसरात पेरणी झालेला गहू अंकुरत आहे. शेतकरी आता रबीतील पिकांच्या सिंचनाकडे लक्ष देत आहे. खरीप हंगामातील नुकसान या पिकांमधून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिवसरात्र सिंचन केले जात आहे. मात्र रात्री सिंचन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अनेकांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहे.

विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल रबी हंगामातील बहुतांश पेरणी पूर्णत्वास गेली आहे. आता पिकांचे सिंचन सुरू झाले. मात्र लोडशेडींग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या उभी ठाकली आहे. ओलितासाठी दिवसभर सलग वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. विजेअभावी अनेक शेतकऱ्यांना रात्री सिंचन करावे लागते. मात्र रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे सलग वीज उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :agricultureशेती