शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती.

ठळक मुद्देसंचारबंदीत गर्दी : वयोवृद्धांची संख्या अधिक, काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला फाटा, पोलिसांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी वगळता मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर निघण्यास मनाई आहे. असा प्रयत्न करणाऱ्या सुमारे शंभरावर लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मंगळवारी यवतमाळ शहर व जिल्हाभर अनेक बँकांसमोर प्रचंड गर्दी दिसल्याने जणू लॉकडाऊनचे लॉक तुटल्याचा भास होत होता.शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती. काही ठिकाणी सावलीची व्यवस्था होती तर कुठे व्यवस्था असूनही त्याचा उपयोग होऊ शकला नाही. काही ठिकाणी सावली शोधण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंग झुगारण्यात आले. जनधन खात्यातील पैसे काढणाऱ्यांमध्ये बहुतांश वयोवृद्धांचा समावेश होता. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कुुटुंब कल्याण योजनेचा दोन हजारांचा हप्ता बँकेत जमा झाला का हे तपासण्यासाठीही कित्येकांनी सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. काहींना केवळ बॅलन्स चेक करायचे होते, या गर्दीमध्ये निवृत्ती वेतनधारक, निराधारांचे मानधनधारक यांचाही समावेश होता.स्टेट बँकेच्या धामणगाव रोड स्थित मुख्य शाखेत मोठी रांग पहायला मिळाली. याच बँकेच्या मार्इंदे चौक रोडवरील शाखेतही अशीच स्थिती होती. आझाद मैदानासमोरील महाराष्ट्र बँक तसेच युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य बँकांच्या शाखामध्ये खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिव्हील लाईन येथील मिनी एटीएम शाखेत तर नागरिकांची गर्दी चक्क रस्त्यावर आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांब रांग पहायला मिळाली. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली गेली होती. परंतु सोशल डिस्टन्सिंग व रांगेमुळे त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. त्यांना बाहेर थांबावे लागले. बँकेत आलेले ग्राहक अंतर पाळत नाहीत म्हणून त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांना पाचारण केले गेले. पोलिसांनी त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र नागरिकांचा नाईलाज होता. एवढ्या कडाक्याच्या उन्हात कुठे सोशल डिस्टन्सिंग पाळावे असा सवाल ते पोलिसांनाच विचारताना दिसले. या गर्दीत काहींनी मास्क लावला नसल्याचेही धोकादायक चित्र पहायला मिळाले. शहरात एका ठिकाणी भोजन वाटप सुरू होते. तेथेसुद्धा गरजूंनी प्रचंड गर्दी केली. परंतु सोशल डिस्टन्सिंग, मास्क व कोरोनापासून सावधगिरीच्या अन्य उपाययोजनांना तेथे फाटा दिला गेल्याचे चित्र होते. जनधनच्या ५०० रुपयांसाठी झालेली गर्दी पाहून गोरगरिबांच्या लॉकडाऊनमधील आर्थिक स्थितीचा अंदाज येतो.रांगेतील नागरिकांंना पाणीही नाहीयवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्त्यांची बरीच गर्दी पहायला मिळते. बहुतांश प्रामाणिकच कार्य करीत असली तरी काही जण मात्र केवळ पोलीस पासवर संचारबंदीतही बिनधास्त फिरता येते म्हणून हंगामी सामाजिक कार्यकर्ते बनले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष वर्तणुकीतून हीबाब अधोरेखीत होते. मंगळवारी अनेक बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात वयोवृद्धांची संख्या अधिक होती. तेथे तैनात असलेल्या पोलिसांना हे काही सामाजिक कार्यकर्ते आवर्जुन नाश्ता, जेवण, पाणी आणून देत होते. त्याच वेळी रांगेत उभ्या असलेल्या वयोवृद्धांनाही किमान पाणी देऊन त्यांची सेवा करण्याची माणुसकी कुणीही दाखविली नाही. हे नागरिक पाण्यासाठी कार्यकर्त्यांच्या तोंडाकडे पाहत होते. अशा संधीसाधू सामाजिक कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने मग केवळ सेवा हाच हेतू ठेऊन घराबाहेर पडलेल्यांकडेही साशंकतेने पाहण्याची समाजाला संधी मिळते.यवतमाळच्या भाजी मंडईत सारेच बिनधास्तसंदीप टॉकीज परिसरातील विठ्ठलवाडी नजीकच्या कॉटन मार्केट भागात दररोज भाजी मंडई भरते. मंगळवारी सकाळी तेथे कोरोना असूनही खरेदीसाठी आलेले नागरिक बिनधास्त वागताना दिसले. तेथे ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क होते. विशेष असे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना खरोखर होत आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आहे. या मंडईत नगरपरिषदेचे वाहन व कर्मचारी तैनात होते. परंतु त्यांचे या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले.

टॅग्स :bankबँक