शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

फोटो महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग ...

फोटो

महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग आदी गावांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून पडले आहे.

नदी, नाल्याच्या काठावरील पुराने वाहून जाणारी घरे व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या अद्याप कमी करता आली नाही. तालुक्यात वाकान, तिवरंग गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पूरग्रस्तांना भूलथापा देऊन मते घेतली. मात्र, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

तालुक्यातील नदी व नाल्यामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील नागरिकांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व पदाधिकारी या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे, दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केवळ जुजबी कारणासाठी जिल्हा स्तरावर धूळ खात पडला आहे.

वाकान हे १,२०० लोक वस्तीच गाव २००५ मध्ये पुरामुळे बाधित झालं. ७६ कुटुंबे उघड्यावर आले. १३ जनावरे मृत्युमुखी पडली होती, तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडा पाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी पुनर्वसनाचा प्रस्ताव बोलावून घेतला. ३० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत पुनर्वसनाचे कागदी घोडे सरकविण्यात आले. मात्र, २६० कुटुंब आजही रेड झोनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सीमा सुनील राठोड यांनी दिली. केवळ येथील मोजणी शीट उपलब्ध नसल्यामुळे पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.

तिवरंग हे दोन हजार ३२७ लोकसंख्येचे गाव आहे. गाव जवळच असलेल्या नाल्यामुळे वारंवार बाधित होते. मोठा पाऊस झाला की, १०० ते १५० घरे पाण्याखाली येतात. या रेड झोनमधील घरांचे कायम पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे तेथील सरपंच प्रा.जयश्री सुनील राठोड यांनी सांगितले. तेथील पुनर्वसनाचा प्रस्ताव नगररचना कार्यालयात धूळखात पडून आहे.

बॉक्स

नदी, नाले ठरत आहेत धोक्याचे

नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे पोहंडूळ, तिवरंग, भोसा, हिवरा संगम, कवठा, थार बुद्रुक, वाकोडी, करंजखेड, कासारबेळ, मोरथ, आनंदनगर आणि धनोडा अशी किमान दहा गावे आणि त्यामधील काही भाग पुराच्या वेढ्यामुळे बाधित होत असतो. या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, ही समस्या लालफीतशाहीत अडकली आहे.