शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

फोटो महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग ...

फोटो

महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग आदी गावांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून पडले आहे.

नदी, नाल्याच्या काठावरील पुराने वाहून जाणारी घरे व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या अद्याप कमी करता आली नाही. तालुक्यात वाकान, तिवरंग गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पूरग्रस्तांना भूलथापा देऊन मते घेतली. मात्र, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

तालुक्यातील नदी व नाल्यामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील नागरिकांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व पदाधिकारी या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे, दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केवळ जुजबी कारणासाठी जिल्हा स्तरावर धूळ खात पडला आहे.

वाकान हे १,२०० लोक वस्तीच गाव २००५ मध्ये पुरामुळे बाधित झालं. ७६ कुटुंबे उघड्यावर आले. १३ जनावरे मृत्युमुखी पडली होती, तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडा पाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी पुनर्वसनाचा प्रस्ताव बोलावून घेतला. ३० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत पुनर्वसनाचे कागदी घोडे सरकविण्यात आले. मात्र, २६० कुटुंब आजही रेड झोनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सीमा सुनील राठोड यांनी दिली. केवळ येथील मोजणी शीट उपलब्ध नसल्यामुळे पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.

तिवरंग हे दोन हजार ३२७ लोकसंख्येचे गाव आहे. गाव जवळच असलेल्या नाल्यामुळे वारंवार बाधित होते. मोठा पाऊस झाला की, १०० ते १५० घरे पाण्याखाली येतात. या रेड झोनमधील घरांचे कायम पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे तेथील सरपंच प्रा.जयश्री सुनील राठोड यांनी सांगितले. तेथील पुनर्वसनाचा प्रस्ताव नगररचना कार्यालयात धूळखात पडून आहे.

बॉक्स

नदी, नाले ठरत आहेत धोक्याचे

नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे पोहंडूळ, तिवरंग, भोसा, हिवरा संगम, कवठा, थार बुद्रुक, वाकोडी, करंजखेड, कासारबेळ, मोरथ, आनंदनगर आणि धनोडा अशी किमान दहा गावे आणि त्यामधील काही भाग पुराच्या वेढ्यामुळे बाधित होत असतो. या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, ही समस्या लालफीतशाहीत अडकली आहे.