शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

फोटो महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग ...

फोटो

महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग आदी गावांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून पडले आहे.

नदी, नाल्याच्या काठावरील पुराने वाहून जाणारी घरे व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या अद्याप कमी करता आली नाही. तालुक्यात वाकान, तिवरंग गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पूरग्रस्तांना भूलथापा देऊन मते घेतली. मात्र, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

तालुक्यातील नदी व नाल्यामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील नागरिकांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व पदाधिकारी या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे, दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केवळ जुजबी कारणासाठी जिल्हा स्तरावर धूळ खात पडला आहे.

वाकान हे १,२०० लोक वस्तीच गाव २००५ मध्ये पुरामुळे बाधित झालं. ७६ कुटुंबे उघड्यावर आले. १३ जनावरे मृत्युमुखी पडली होती, तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडा पाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी पुनर्वसनाचा प्रस्ताव बोलावून घेतला. ३० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत पुनर्वसनाचे कागदी घोडे सरकविण्यात आले. मात्र, २६० कुटुंब आजही रेड झोनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सीमा सुनील राठोड यांनी दिली. केवळ येथील मोजणी शीट उपलब्ध नसल्यामुळे पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.

तिवरंग हे दोन हजार ३२७ लोकसंख्येचे गाव आहे. गाव जवळच असलेल्या नाल्यामुळे वारंवार बाधित होते. मोठा पाऊस झाला की, १०० ते १५० घरे पाण्याखाली येतात. या रेड झोनमधील घरांचे कायम पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे तेथील सरपंच प्रा.जयश्री सुनील राठोड यांनी सांगितले. तेथील पुनर्वसनाचा प्रस्ताव नगररचना कार्यालयात धूळखात पडून आहे.

बॉक्स

नदी, नाले ठरत आहेत धोक्याचे

नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे पोहंडूळ, तिवरंग, भोसा, हिवरा संगम, कवठा, थार बुद्रुक, वाकोडी, करंजखेड, कासारबेळ, मोरथ, आनंदनगर आणि धनोडा अशी किमान दहा गावे आणि त्यामधील काही भाग पुराच्या वेढ्यामुळे बाधित होत असतो. या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, ही समस्या लालफीतशाहीत अडकली आहे.