शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

फोटो महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग ...

फोटो

महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग आदी गावांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून पडले आहे.

नदी, नाल्याच्या काठावरील पुराने वाहून जाणारी घरे व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या अद्याप कमी करता आली नाही. तालुक्यात वाकान, तिवरंग गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पूरग्रस्तांना भूलथापा देऊन मते घेतली. मात्र, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

तालुक्यातील नदी व नाल्यामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील नागरिकांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व पदाधिकारी या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे, दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केवळ जुजबी कारणासाठी जिल्हा स्तरावर धूळ खात पडला आहे.

वाकान हे १,२०० लोक वस्तीच गाव २००५ मध्ये पुरामुळे बाधित झालं. ७६ कुटुंबे उघड्यावर आले. १३ जनावरे मृत्युमुखी पडली होती, तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडा पाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी पुनर्वसनाचा प्रस्ताव बोलावून घेतला. ३० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत पुनर्वसनाचे कागदी घोडे सरकविण्यात आले. मात्र, २६० कुटुंब आजही रेड झोनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सीमा सुनील राठोड यांनी दिली. केवळ येथील मोजणी शीट उपलब्ध नसल्यामुळे पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.

तिवरंग हे दोन हजार ३२७ लोकसंख्येचे गाव आहे. गाव जवळच असलेल्या नाल्यामुळे वारंवार बाधित होते. मोठा पाऊस झाला की, १०० ते १५० घरे पाण्याखाली येतात. या रेड झोनमधील घरांचे कायम पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे तेथील सरपंच प्रा.जयश्री सुनील राठोड यांनी सांगितले. तेथील पुनर्वसनाचा प्रस्ताव नगररचना कार्यालयात धूळखात पडून आहे.

बॉक्स

नदी, नाले ठरत आहेत धोक्याचे

नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे पोहंडूळ, तिवरंग, भोसा, हिवरा संगम, कवठा, थार बुद्रुक, वाकोडी, करंजखेड, कासारबेळ, मोरथ, आनंदनगर आणि धनोडा अशी किमान दहा गावे आणि त्यामधील काही भाग पुराच्या वेढ्यामुळे बाधित होत असतो. या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, ही समस्या लालफीतशाहीत अडकली आहे.