शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साडेआठशे शाळांच्या ‘अस्तित्वा’वर लागणार फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 10:25 IST

राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्दे२६७ शाळा बंद होणार यू-डायस क्रमांकासाठी धावाधाव

अविनाश साबापुरे।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे. यू-डायस क्रमांक नसलेल्या या शाळा शंभर टक्के अनधिकृत नसल्या तरी शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनात त्या अस्तित्वहीन झाल्या आहेत. कोणतीही योजना राबविताना या शाळांचा विचार केला जात नाही. विशेष म्हणजे, यातील २६७ शाळांना आता यू-डायस क्रमांकही नाकारण्यात आल्याने त्या बंद होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील प्रत्येक शाळेला यू-डायस क्रमांक (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन) घेणे बंधनकारक केले आहे. हा क्रमांक असलेल्या शाळांची संख्या विचारात घेऊनच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रत्येक शाळेने यू-डायस क्रमांक मिळविण्याचे आदेश ७ आॅगस्ट रोजी दिले होते. विशेष म्हणजे, हा क्रमांक घेण्याची पद्धतीही सोपी करण्यात आली होती. १५ सप्टेंबरपूर्वी यू-डायस न घेतल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.या आदेशाने राज्यातील संस्था चालकांचे धाबे दणाणले. अंतिम मुदत उलटून गेल्यावरही तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस नसल्याची बाब उघड झाली. या शाळांनी आॅनलाईन क्रमांक मिळविण्याची धडपड केली. मात्र, त्यातील २६७ शाळांना शिक्षणाधिकारी स्तरावरूनच झिडकारण्यात आले. ‘रिजेक्ट’ झालेल्या या शाळा सुरूच राहिल्यास संबंधित संस्थाचालकावर कायदेशिर कारवाई सुरू करण्याचे आदेश शिक्षण सचिवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राजधानीतच सर्वाधिक फसवाफसवीयू-डायस क्रमांक न घेताच कारभार करणाऱ्या सर्वाधिक ३०४ शाळा मुंबईमध्ये आढळल्या आहेत. शैक्षणिक माहेरघर अशी ओळख मिळविलेल्या शहरांमधील संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात फसवाफसवी करत शाळा चालविल्याचे दिसते. कारण पुण्यात १९० तर औरंगाबादमध्ये १६७ इतक्या मोठ्या संख्येतील शाळांकडे यू-डायस क्रमांकच नाही. राजधानी जवळच असलेल्या ठाणे, रायगड, पालघरसारख्या जिल्ह्यात तब्बल ४७८ शाळा शिक्षण विभागाच्या दफ्तरी नोंदणीकृत नाहीत.जिल्हानिहाय बंद होणाऱ्या शाळाशिक्षणाधिकाऱ्यांनी यू-डायस क्रमांक नाकारल्याने राज्यात २६७ शाळा बंद होणार आहेत. त्यांची जिल्हानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. नागपूर ३, अकोला १, अमरावती १, वर्धा ३, औरंगाबाद १५, बिड १६, जळगाव ३, जालना ११, कोल्हापूर १६, लातूर १, मुंबई ३८, नंदूरबार २, नाशिक १६, उस्मानाबाद ३, पालघर ६०, परभणी ३, पुणे ९, नत्नागिरी ९, सातारा १ सिंधुदुर्ग २, सोलापूर ३, ठाणे ५१. विशेष म्हणजे, यात विदर्भातील केवळ ६ शाळांचा समावेश असून यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम जिल्ह्यातील एकही शाळा यू-डायसविना बंद होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा